• Sun. Mar 8th, 2026
    किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या, प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक; नेमकं काय घडलं?

    पालघर : प्रियकराने किरकोळ वादातून आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पश्चिम बंगाल राज्यातून डहाणू पोलिसांनी अटक केली आहे.डहाणू तालुक्यातील लोणीपाडा परिसरात १५ मार्च रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला शवविच्छेद अहवालात महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा डहाणू पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
    एक एक मत महत्त्वाचं, प्रतिष्ठेची लढत, बहिणीला पाडायचा प्लॅन, अजितदादांची पैलवानांसोबत चर्चा

    पश्चिम बंगाल येथून मिनाज मुल्ला व अनिशा खातून हे प्रेमी जोडपे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात काही महिन्यांपूर्वी पळून आले होते. हे दोघेही विवाहित असून ते आपल्या पती-पत्नीला सोडून खोट्या नावाने मागील काही महिन्यांपासून लोणीपाडा परिसरात राहत होते. या दोघांमध्ये किरकोळ वाद व खटके उडत असत. असाच किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात प्रियकर मिनाज मुल्ला व अनिशा खातून हिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपी मिनाज मुल्ला पश्चिम बंगाल राज्यात फरार झाला. पोलिसांनी परिसरात चौकशी व तपास केला असता महिलेसोबत राहणारा व्यक्ती तेथे नसल्याची बाब उघड झाली. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीने पळून गेलेल्या हत्या करुन फरार झालेल्या मिनाज मुल्ला याला डहाणू पोलिसांनी २५ मार्च रोजी मोठ्या शिताफीने पश्चिम बंगाल येथून अटक केली.

    अटक आरोपी मिनाज मुल्ला उर्फ रविंद्र रेड्डी विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात भा.द.वि.स. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डहाणूच्या पोलीस उपअधीक्षक अंकिता कणसे करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed