• Sun. Mar 15th, 2026
    बड्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, पण शब्द कुणीच देईना, शेवटी शांतीगिरी महाराज मनसेच्या दारात!

    शुभम बोडके, नाशिक : मनसेकडून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील तीन जागांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात नाशिक लोकसभेच्या जागेचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचं भाकित वर्तवलं जात आहे. नाशिक लोकसभेसाठी मनसेकडून शांतिगिरी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव मनसेने सादर केला असल्याची माहिती समोर येते आहे.लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत असून जागा वाटपाचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही. अशातच आता मनसेने महायुतीत उडी घेतली असून त्यांनीही लोकसभेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे राज्यात लोकसभा निवडणुका लढणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मनसेचं प्राबल्य असलेल्या दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक अशा तीन जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांच्या मार्फत समजते. दक्षिण मुंबई मधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिर्डी मधून मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नाशिक मधून जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा १००८ श्री. शांतिगिरी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव मनसेने दिलीत सादर केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
    Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात

    नाशिकमध्ये मनसेचे प्राबल्य असून शहरातील संघटना मजबूत आहे. ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन सोहळा व अधिवेशन देखील नाशिक जिल्ह्यात पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मनसेला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या असे आवाहन जनतेला केले. २००९ साली मनसेचे तीन आमदार नाशिकमधून निवडून आले होते. तसेच महानगरपालिकेतही मनसेला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यामुळे मनसे नाशिक लोकसभेतून उमेदवार देण्यास इच्छूक असून आता महायुतीतून नाशिक लोकसभेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

    शांतिगिरी महाराज यांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भक्त परिवार आहे. त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो आणि एक हिंदुत्वादी चेहरा म्हणून मनसे त्यांना उमेदवारी देऊ शकते. मात्र मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे डोकेदुखी मात्र वाढणार आहे. भाजपलाही नाशिकची जागा हवी आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी आधीच घोषित केली आहे. त्यामुळे आता महायुतीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून मनसेला हिरवा कंदील मिळतो का? नाशिक लोकसभेची जागा नक्की कोण लढवणार? हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed