• Sat. Jun 13th, 2026
    धंगेकरांना तयारीला लागण्याच्या सूचना, आबा संतापले, निष्ठावंतांचा मुद्दा काढत दिल्लीला इशारा

    पुणे: काँग्रेसच्या उमेदवारांची राज्यातील संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये पुण्यामधून रविंद्र धंगेकर यांचं नाव अंतिम झालं असल्याची माहिती आहे. रवींद्र धंगेकर यांचं नाव अंतिम झाल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. निष्ठावंतांना संधी दिली नाही तर त्याचे विपरीत परिणाम घडतील, असा थेट इशाराच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी दिला आहे.
    भाजपवाल्यांना गावबंदी नको तर घरबंदी करा, प्रणिती शिंदे यांची मराठा समाजाला भावनिक साद
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे. अन्यथा त्याचे विपरीत पडसाद सहाही विधानसभा मतदारसंघात निश्चित उमटतील, अशी आक्रमक भूमिका घेत पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पक्षश्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांची पूर्वनियोजित बैठक झाली. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन केले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे असा थेट सवाल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला. ज्यांनी आजवर पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केले त्यांनाच बाजूला सारण्याचे राजकारण होत असेल तर आता पक्षाच्या श्रेष्ठींनी निष्ठावंत म्हणजे काय? याची व्याख्या जाहीररीत्या सांगावी, असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांनी दिले. कोणत्याही स्थितीत निष्ठावंतांना संधी मिळालीच पाहिजे तरच एकदिलाने काम केले जाईल, असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांना थेट सांगितले.

    दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना भेटायचं का? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची महिला पदाधिकाऱ्यांनी तक्रार, चंद्रकांत खैरे संतापले

    याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत आहे. सलग ३० वर्षे निवडून येत आहे आणि विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती. त्यामुळे जाहीर सभा घ्या आणि पुणेकरांचा कौल घेऊन उमेदवार ठरवा हे पत्र दिले. मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले. मात्र, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत आहे हे वातावरण निर्माण झाले. ते पत्र जर लेटर बॉम्ब होते मग आता पुढे पहा काय होते. पुढील भूमिका ही कार्यकर्ते, समर्थक, मतदारांशी बोलून लवकरच ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आताचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना पूर्वी कुणी थारा देत नव्हते. अशा नेत्यांची नावे विकासकामांच्या कोनशिलेवर माझ्याच आग्रहामुळे आयुष्यभर कोरली गेली. याची आठवणही आबा बागुल यांनी पक्षांतर्गत राजकारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना यावेळी करून दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed