रिपब्लिकन पक्षातर्फे शनिवारी चेंबूर येथे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ही भूमिका जाहीर केली. यावेळी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावने, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी उपस्थित होते.
‘रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे ४५ खासदार निवडून आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावा,’ असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
मुंबईचे उपमहापौरपद मिळविण्याचा रिपाइंचा संकल्प असून, त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात कामाला लागावे. जनतेत मिसळून जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
Read Latest National News Updates And Marathi News
महायुतीचे इतर नेते अनुपस्थित
या संकल्प मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, महायुतीतील एकही बडा नेता या मेळाव्यास उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.