• Thu. Mar 19th, 2026

    जो पक्ष कमीतकमी ‘आपले’ १४ उमेदवार देईल तोच आपला, आता सत्तेचं गणित मांडावं लागेल : आंबेडकर

    जो पक्ष कमीतकमी ‘आपले’ १४ उमेदवार देईल तोच आपला, आता सत्तेचं गणित मांडावं लागेल : आंबेडकर

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. काहींच्या वाट्याला ही संधी येते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांना कोणीही ओळखत नव्हते. तो सामान्यातला सामान्य व्यक्ती होता. पण आज तो शरद पवारांचा बाप झालाय, असे वादग्रस्त विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

    ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार महासभा सोमवारी (दि.२६) शहरातील जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर बोलत हेते. एल्गार महासभेला प्रकाशअण्णा शेंडगे, प्रा.टी.पी.मुंडे, प्रा.किसान चव्हाण, प्रा.लक्ष्मण हाके, संदेश चव्हाण, डॉ.बी.डी.चव्हाण, प्रा.विष्णु जाधव, अरुण जाधव, नागोराव पांचाळ, लक्ष्मण गायकवाड, स्वागताध्यक्ष तथा मुख्य आयोजक इंजिनिअर सुरेश फड, हरिभाऊ शेळके, अ‍ॅड.जाधव, विशाल बुधवंत, डॉ.धर्मराज चव्हाण, प्रा.डॉ.सुरेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

    अ‍ॅड. आंबेडकर यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाषणात टीका केली. ते म्हणाले, जे जे उपेक्षित आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी वंचितांची चळवळ आहे. त्यामुळे मुस्लिम समाजानेही ओबीसींच्या सभा-संमेलनात सामील व्हायला हवे. कोणता पक्ष आपला हे ओबीसींनी ओळखण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत जो पक्ष कमीतकमी १४ उमेदवार देईल तो आपला समजावा. आरक्षण टिकवायचे असेल तर आपल्या प्रतिनिधींना सत्ता मिळाली पाहिजे. ५१ टक्के मतदार होईपर्यंत आपली सत्ता येणार नाही म्हणून जिंकण्याचे गणित मांडावे लागेल. ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते केले पाहिजे, तशी मानसिकता बनवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

    आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो हे ७० वर्षात सर्वांनीच अनुभवले आहे. आम्हाला मिळालेलं आरक्षण आम्हालाच टिकवायचे आहे. शासनाने यापुढे कुणालाही आरक्षण देताना ते स्वतंत्रपणे द्यावे अशी आमची साधी मागणी आहे. यासाठी ओबीसी, भटके-विमुक्त, आदिवासी, दलितांनी मिळून सत्ता बसवली पाहिजे, तशी मानसिकता ठेवा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
    बारामतीत नणंद भावजयीच्या लढतीत OBC उमेदवाराचा विजय होईल, आमचा उमेदवार तयार : प्रकाश शेंडगे

    प्रकाशअण्णा शेंडगे यांनी सांगितले की, गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र ओबीसीमधून आरक्षणास विरोध आहे. भाजप सरकार दलीत-ओबीसीच्या आरक्षणाचे वाटोळे करायला निघाले आहे, असा आरोपही त्यांनी केला. आजवर केलेली चूक पुन्हा करायची नाही. प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा लढा आता महाराष्ट्रात सुरू होत आहे.
    सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले.

    सहा महिन्यांपूर्वी कोणालाही माहिती नसणारा जरांगे पाटील आता शरद पवारांचा बाप झालाय: प्रकाश आंबेडकर

    ही एल्गार परिषद यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ थोरे, हरिहर वंजे, डॉ.धर्मराज चव्हाण, नागोराव पांचाळ, विशाल बुधवंत, डॉ.सुनील जाधव, श्रीहरी भुजबळ, अनिल गोरे, संजय दराडे, प्रमोद कुटे, मनोहर वावळे, सुमित जाधव, सचिन गंगाखेडकर, रणजीत मकरंद, सुनील चरकपल्ली, संदीप खाडे, संतोष राठोड व ओबीसी समाजाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed