• Sat. Sep 21st, 2024
ज्युनिअर कॉलेज अन् MIDCचं स्वप्न अधुरंच राहिलं, मनोहर जोंशी सरांच्या निधनाने गावकरी हळहळले

रायगड : माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचं निधन झालं. दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी हे मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील नांदवी गावचे सुपुत्र होते. त्यांचं आपल्या गावावर विशेष प्रेम होतं. गावातील शाळा त्यांनीच मदत करून नावारुपास आणली. नूतन विद्यामंदिर या शिक्षण संस्थेच्या असलेल्या या शाळेला नामदार मनोहर गजानन जोशी असं नाव देण्यात आलं.”मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी या शाळेला अनेकदा भेट दिली. या शाळेचा ज्युनिअर कॉलेजचा प्रस्ताव व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव त्यांच्या संकल्पनेत होता. मात्र, ज्युनिअर कॉलेजच्या प्रस्ताव काही कारणाने पुढे सरकू शकला नाही”, अशी आठवण नांदवी येथील शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक सदानंद महाजन यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’जवळ बोलताना दिली. ”सर या संस्थेचे अनेकवर्षे उपाध्यक्ष होते, तर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन ऍटर्नी जनरल सी.जे. सावंत होते. नांदवीच्या तलावाचे RCF कंपनी मार्फत सुशोभीकरण, नियोजित आपल्या गावाच्या मागे असलेल्या मोकळ्या माळावरील जागेवर MIDC ही दोन स्वप्न त्या वेळच्या काही पुढार्‍यांच्या भूमिकेमुळे पूर्ण होऊ शकली नाहीत. हे शल्य कायम राहील”, अशी मोठी आठवण नांदवी येथील अविनाश सावंत यांनी सांगितली.
आधी खुर्ची गेली, मग स्टेज; दोन्हीसाठी कारण ठरले गैरसमज; काय घडलेलं? जोशी सरांनीच सांगितलेलं
”जोशी सर अत्यंत वक्तशीर होते. ते नांदवी येथे मुक्कामासाठी अनेकदा यायचे. एकदा त्यांनी आपल्या शाळेला अचानक सव्वादहा वाजता भेट दिली. शिक्षक मुख्याध्यापक वेळेत येतात का नाही याची चाचणी सरांना करायची होती. पण आपण त्या वेळेला वेळेवरच हजर होतो हे पाहून सरांनी हे समाधान व्यक्त केले. तुम्ही मला येऊन वर्षा बंगल्यावर भेटा आपल्याला गावासाठी, मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. ही संकल्पना सतत सरांच्या डोक्यात होती. त्यामुळे ज्युनिअर कॉलेजचा प्रस्तावही करण्यात आला होता”, अशी एक आठवण महाजन सरांनी यांनी सांगितली. ”सरांनी या शाळेसाठी त्यावेळी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. सरांचे या शाळेसाठी असलेले योगदान लक्षात घेऊन जोशी सर राज्याचे मुख्यमंत्री असतानाच नांदवी येथील या शाळेला सरांचं नाव देण्यात आलं”, असंही निवृत्त मुख्याध्यापक सदानंद महाजन यांनी सांगतलं

”गावातील गजानन सावंत हे सरांचे गुरु होते. ते गावात आल्यावर ते त्यांची आवर्जून भेट घेत असत. सावंत सर व जोशी सरांनी मिळूनच गावातील शिक्षण संस्था मोठी केली. बॅरिस्टर अंतुले यांच्या हस्ते या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने संपन्न झाला होता. सरांचे राजकीय मूल्यमापन करण्याची ही वेळ नाही. पण आपल्या रायगडमधील गोरेगाव विभागातील नांदवी सारख्या खेडेगावात जन्म घेवून कष्टप्रद बालपण घालविलेल्या एक सर्वसामान्य व्यक्ती, केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परिसस्पर्शाने सुवर्णमय झालेले एक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व होते”, असंही सदानंद महाजन म्हणाले.

”रायगडला आजपर्यंत आपल्या भागातील दोन मुख्यमंत्री मिळाले. त्या दोघांचेही तीर्थरूप अण्णा यांच्याशी घरगुती आणि सामाजिक नाते सर्वकाळ राहिले होते. त्यातील एक मा.जनाब अब्दुल रहमान अंतुले साहेब आणि दुसरे मा. मनोहर जोशी सर हे दोघेही आपल्या विभागातील, केवळ १० किलोमीटर अंतरावर दोघांची गावं आहेत. पण दोघांच्या कार्यशैलीत जमीन अस्मानाचा फरक होता. सरांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत आपल्या गावाच्या विकासासाठी त्यांची अनेक स्वप्ने होती. त्यातील काही त्यांनी सत्यातही उतरवली. त्यामध्ये प्रामुख्याने नांदवीच्या तलावाचे RCF कंपनी मार्फत सुशोभीकरण, नियोजित आपल्या गावाच्या मागे असलेल्या मोकळ्या माळावरील जागेवर MIDC कारखाना ही दोन कामे त्यांनी हाती घेतली होती. परंतु दुर्दैवाने त्यावेळच्या आपल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या आपआपसातील अंर्तगत वादविवादाने सरांची ही दोन स्वप्ने साकार होवू शकली नाहीत. हेच एक फार मोठे शल्य मनात नेहमीच आहे”, असं सांगताना निवृत्त मुख्खाध्यापक सदानंद महाजन भावूक झाले.
मराठीच्या जागराला मान्यवरांचा परिसरस्पर्श; ‘मायमराठी’ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ‘टाइम्स’च्या प्रांगणात अलोट गर्दी
”रायगड मधील हे दोन्ही महान नेते आज अस्तित्वात नाहीत. पण भविष्यात त्यांची उंची गाठणारे नेतृत्व कोकणात सध्या तरी कोणीही दिसत नाही”, अशी नांदवी-उरण येथील अविनाश हरिभाऊ सावंत यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed