• Sun. Jun 7th, 2026
    अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा, गोखले पुलाबाबत मोठी अपडेट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुलाची एक बाजू पुढील आठवड्यात खुली करण्यात येणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. यामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण पूल मे किंवा डिसेंबरअखेपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे.अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाच्या कामांसाठी आतापर्यंत मोठा कालावधी लागला आहे. हा पूल ७ नोव्हेंबर २०२२पासून पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचे काम १ एप्रिल २०२३पासून सुरू करण्यात आले आहे. पूलबांधणीसाठी आवश्यक पोलादाचा तुटवडा निर्माण झाल्याने हे काम काही काळ रखडले होते. संबंधित पोलाद कारखान्यातून लोखंडी प्लेट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र गर्डर बनविणाऱ्या अंबाला येथील फॅब्रिकेशन कारखान्यात अतिवृष्टीमुळे पाणी भरले. त्यामुळे गर्डरच्या कामात सुमारे १५ ते २० दिवसांचा कालावधी वाढला. गर्डरचे सुटे भाग पुलाच्या बांधकामस्थळी आणून जून २०२३मध्ये तो बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.
    माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
    गर्डरचे काम २० नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण करून रेल्वेच्या हद्दीत सरकविण्याचे काम २ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या रस्ता रेषेमध्ये, आरसीसी आधारस्तंभावर गर्डर स्थानापन्न करण्यासाठी ७.८ मीटर उंचीवरून खाली आणण्याचे काम १४ जानेवारीला पूर्ण करण्यात आले. स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक व जोखमीचे असलेले हे काम भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. पुलाचे काम रखडल्याने पश्चिम उपनगरातील नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते आहे.

    दरम्यान, पुढच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुलाची एक बाजू खुली करण्यात येणार असल्याचे अंधेरी येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनी सांगितले. ‘पुलाच्या एका भागाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि एस.व्ही. रोड बाजूचे पुलावर मास्टिकचा स्तर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यास सुमारे सात ते १० दिवस लागू शकतात. ते पूर्ण होताच एक बाजू वाहतुकीसाठी खुला केली जाईल. तेली गल्लीकडे जाणारा मार्गही यासह खुला केला जाईल’, असे साटम म्हणाले.

    …तर अंधेरी सब वेवरील ताण कमी

    ‘येत्या मे, जूनपर्यंत पुलाची दुसरी बाजू खुली झाल्यास अंधेरी सब वेवरील ताण कमी होईल’, असे या भागातील भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी सांगितले. ‘कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना या पुलाच्या कामाबाबत आता पुरेसा अनुभव आला आहे. गर्डर बनविण्याच्या कामालाही आता गती मिळाली आहे. त्यामुळे वेगवान पद्धतीने काम पूर्ण करून नागरिकांनी दिलासा द्यावा’, असे सामंत म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed