• Sat. Sep 21st, 2024
दारु पिल्यानंतर जोरदार वाद, घरात घुसून मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत संपवलं

पंकड गाडेकर, वाशिम : सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये वाद उफाळून आल्याने जेवण करत असलेल्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील टाकळी गावातील मृतक व आरोपी दोघे मित्र होते. हत्या झालेला व्यक्ती आणि हत्या करणारा हे दोघे सोबत काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. नेहमी सोबत असणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतःच्या घरी येऊन जेवण करत होता. त्याचवेळी आलेल्या मित्राने अचानक संतोषच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने संतोषचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळारून पसार झाला असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा, आता वेळ आलीये-पाऊल टाका : रितेश देशमुख

दारू विक्रीतून गावोगावी वाद; पोलिसांचे दुर्लक्ष

वाशीम जिल्ह्यात बहुतांश गावात राजरोसपाने अवैध दारू विक्री केली जाते. यातून किरकोळ वाद उफाळून आल्याने हाणामारीच्या घटना देखील समोर येत आहेत. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत असतानाही पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed