• Sat. Sep 21st, 2024
नातू करतोय आजी आजोबांचे स्वप्न साकार; जेईई परीक्षेत शेतकऱ्याच्या मुलाची उंच भरारी

पंकज गाडेकर
वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील बेलखेड येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलानं जेईई परीक्षेमध्ये १०० पैकी १०० टक्के मिळवून इतिहास रचला आहे. त्याने महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह राज्यभरातून त्याचं मोठं कौतुक केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आय आय टी सारख्या केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी गाह्य धरल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल नुकताच लागलेला आहे.

देशभरात २३ तर महाराष्ट्रातून ३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यामध्ये वाशिमसारख्या छोट्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या निलकृष्ण गजरेचा नंबर असून तो महाराष्ट्रातून प्रथम आला आहे. निलकृष्ण हा मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा असून त्याचे वडील हे गावी शेती करतात. त्यांचं अवघं बारावीपर्यंत शिक्षण झालं असून आपलं उच्च शिक्षणाचं अधुर राहिलेलं स्वप्न मुलानं पूर्ण करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुलाच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच त्यांनी भर दिला. त्याला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत न टाकता त्यांनी सुरुवातीलाच अकोला येथील त्याच्या आत्याकडे पाठवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलं.
अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा, आता वेळ आलीये-पाऊल टाका : रितेश देशमुख
त्यानंतर कारंजा येथील जेसी चवरे हायस्कूल येथे त्याने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीत त्याने ९८ टक्के गुण मिळवून तो प्रथम आला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची JEE ची तयारी सुरू केली. तयारी करत असताना त्याने इन्स्टिट्यूटची परीक्षा दिल्यानंतर त्याला स्कॉलरशिप मिळाली. त्यातून त्याने ऑनलाईन क्लासेस लावले. अकरावी बारावीसाठी त्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बुरूनले कॉलेज येथे टाकले. सध्या तो इथेच बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने जेईईची परीक्षा दिली. सर्व विषयात पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळवून तो महाराष्ट्रात पहिला आला. आता पुढे आयआयटीला त्याचा नंबर लागावा आणि त्याने कॉम्पुटर इंजिनियर व्हावं, अशी त्याच्या बाबाची ईच्छा आहे.

त्यासाठी वडील म्हणून कितीही कष्ट घेण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केला. निलकृष्णाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याच्या वडिलांना राज्यभरातून अभिनंदनाचे फोन येत आहेत. तर बरेच जण त्यांच्या मुलांसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. निर्मलकुमार गजरे ही त्यांच्या मुलाने कशी तयारी केली, याविषयी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. निलकृष्णच्या आजोबांकडे पंधरा एकर शेती आहे. मात्र शेतीत येणाऱ्या सततच्या संकटामुळे शेती परवडत नसल्यानं मुलानं उच्च शिक्षण घ्यावं आणि नोकरी करावी, अशी निलकृष्णाच्या आजी-आजोबांची इच्छा होती.

भावनिक राजकारण तर विरोधी लोकच करत आहेत, शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं

मात्र निलकृष्णाच्या वडिलांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन शेतीत वळले. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं नाही. त्यामुळे निलकृष्णच्या आजी आजोबांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र आता नातू त्यांचं स्वप्न पूर्ण करत असून तो राज्यातून प्रथम आल्यामुळे त्यांनाही मोठा आनंद झाला आहे. जेईई सारख्या कठीण परीक्षेत वाशिमसारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवणे ही अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed