• Sat. Sep 21st, 2024
राज्यात उन्माद सुरु, ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जातेय – छगन भुजबळ

अहमदनगर: आज अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांजवळ संवाद साधला आहे. दरम्यान भाषणात भुजबळांनी मराठा आरक्षणावर जोरदार निशाणा साधला आहे. २७ तारखेला गुलाल उधळलात, तर आता उपोषण कसलं? असा सवाल त्यांनी जरांगे पाटलांना केला आहे.
आमदार गायकवाडांची आवाजाची चाचणी घ्यायचीय, पोलिसांची मागणी; गणपत गायकवाडांना इतक्या दिवसांची पोलीस कोठडी
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, तुम्ही तर म्हणालात आम्हाला आरक्षण मिळालं. गुलाल उधळला. अध्यादेश हातात आला. मात्र लेकाला अध्यादेश म्हणजे काय ते कळत नाही, तसेच मसूदा म्हणजे काय ते कळत नाही. मग आता पुन्हा उपोषणाला कशाला बसता? आज चार दिवस झाले आहेत. राज्यात उन्माद सुरु आहे. रात्री तीन चार वाजेपर्यंत डीजे वाजवला जात आहे. ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जात आहे. आपण जिंकलो, आम्हाला आरक्षण मिळालं. असं बोललं जात आहे, तर उपोषण कशासाठी? असा थेट सवाल भुजबळांनी केला आहे.

सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही, मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंवर पलटवार

आता मी सांगितलं की मी उपोषण करणार आहे, तर आमचे सेक्रेटरी ताबडतोब निघतील. लगेच जीआर तयार… हा घे अध्यादेश… एक एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील वेगवेगळे घटक वर्षानुवर्षे लढत असतात. तरीही त्यांना मिळत नाही. मात्र यांनी नुसतं सांगितलं उपोषण तरीही लगेच धावपळ सुरू होतेस, असा टोलाही मनोज जरांगे यांचं नाव न घेता भुजबळांनी लगावला आहे. मराठा समाजाला माझा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे. मात्र ते वेगळं द्या, आमच्या ताटात देऊ नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. मात्र ते म्हणतात आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या. हे मला काही कळलं नाही, असं वक्तव्य भुजबळांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. मात्र मला प्रश्न नक्कीच पडला आहे. तुम्ही २७ तारखेला मोर्चामध्ये गेलात. त्याला माझा विरोध नाही. मात्र तुम्ही ते जाहीर केलंत की, मी जी शपथ घेतली ती मी पूर्ण केली. यावर मला प्रश्न असा पडला आहे की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ पूर्ण झाली आहे तर हा ओबीसी आयोग आता जे काम करतोय ते कशासाठी? आयोगाचं चाललेलं सर्वेक्षण कशासाठी? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तीन तीन न्यायाधीश बसले आहेत ते कशासाठी? गुलाल तर तुम्ही उधाळलात मग हे कशासाठी चाललं आहे, असे प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहे. त्यांची उत्तर कशी शोधायची? असंही भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed