• Sat. Sep 21st, 2024
विठ्ठलाच्या पंढरीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचा संशय

सोलापूर : पंढरपूर कुर्डूवाडी रोडवर आष्टी जवळ काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दैव बलवत्तर म्हणून गोळीबार झालेले दोघेही या हल्ल्यातून बचावले आहेत. हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याचा पोलिसांचा संशय असून घटनास्थळावरून दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली आहेत.

काल रात्री नऊ ते साडेनऊ च्या दरम्यान सिद्धेश्वर नाईकनवरे आणि त्याचा मेव्हणा आदित्य व्यवहारे हे दुचाकीवरून आष्टीकडे येत असताना मागून आलेल्या अज्ञात दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांना काठीने मारून गाडीवरून पाडले. यानंतर या अज्ञाताने आपल्याकडील गावठी कट्ट्यातून त्यांचेवर दोन गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान ओळखून या दोघांनी गोळ्या चुकवत शेजारच्या उसात धाव घेतली.

काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; मिलिंद देवरांनी ‘हात’ सोडला, आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?
दरम्यान, या मार्गावरून दुसऱ्या मोटारसायकली आल्या आणि अपघात झाल्याचे समजून थांबताना दिसताच हल्लेखोरांनी पळ काढला. यामुळे या जीवघेण्या हल्ल्यातून सिद्धेश्वर नाईकनवरे आणि आदित्य व्यवहारे यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून प्रथमदर्शनी हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याचा अंदाज मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री दिल्लीची धुणीभांडी करतात, कल्याणमध्ये जात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed