Jalgaon News: गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेऊन रामभक्त नाशिकवरून आयोध्याकडे पायी निघाला आहे. अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहून गोदावरी नदीच्या तीर्थाने प्रभू श्री रामचंद्र यांच्यावर अभिषेक करणार आहे. नाशिक येथील ५२ वर्षीय विरेंद्रसिंह टिळे तब्बल पंधराशे किलोमीटरचा पायी प्रवास करून २२ जानेवारीला अयोध्येला पोहोचणार आहेत.
गोदावरीतील पाणी असलेला कलश घेऊन नाशिकच्या रामभक्ताची पायी अयोध्यावारी
