• Sun. Sep 22nd, 2024
लोकसभेला इंडिया आघाडी म्हणून लोक आम्हाला स्वीकारतील, शरद पवारांनी दिलं १९७७ चं उदाहरण

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी राम मंदिराची उभारणी, विधानसभा निवडणुकांचा निकाल, इंडिया आघाडीची बैठक, वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश, आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप यासह विविध मुद्यांवर भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले की, तीन राज्यांच्या निवडणुकांचा निकाल अपेक्षेसारखा नाही हे मान्य करावं लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला अडचणी आहेत असं नाही. आम्ही एकत्रपणे काम केलं तर लोक आम्हाला पर्याय म्हणून स्वीकारतील. इंडिया आघाडीतील लोक आहेत, आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना आम्ही तिघे एकत्र बसून अमरावती आणि इतर जागांचा निर्णय घेणार आहोत, असं शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जून खरगे बसले होते. त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्यासह निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करावा. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सामोरं जावं, असं शरद पवार म्हणाले.

बच्चू कडू यांनी मी त्या रस्त्यानं जात असल्यानं चहा घेण्याची विनंती केली. तर मी जाणार आहे, असं शरद पवार म्हणाले. बच्चू कडूंच्या भेटीत कोणतंही राजकीय कारण नाही, असं शरद पवार म्हणाले.

मायावती यांची महत्त्वाची भूमिका उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आमच्यासोबत आहे. समाजवादी पार्टीला दुखवून आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.

अजित पवार म्हणाले विरोधकांकडे मोदींच्या विरोधात चेहरा नाही यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की ते त्यांना वाटत असेल आम्हाल लोकांना अनेक वाटेल, असं शरद पवार म्हणाले. १९७७ च्या निवडणुकीवेळी कुणी पंतप्रधानपदासाठी न्याय दिलं नव्हतं, असंही शरद पवार म्हणाले.

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तांदूळ स्वस्त होणार; कुठे, कसा मिळणार? जाणून घ्या
भाजप राम मंदिराच्या मुद्यावर राजकारण करतात की व्यवसाय करतात हे आम्हाला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले. लोकसभेच्या जागा वाटपाच्या सूत्राची आम्ही चर्चा केलेली नाही. संसदेचं एक अधिवेशन होईल, त्यात तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल. त्यानंतर यासंदर्भातील निर्णय होईल. राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं नाही. मी मंदिराच्या याच्यात फारसा जात नाही. देव धर्म, पूजा अर्चा यापासून मी लांब असतो. दोन तीन ठिकाणं आहेत श्रद्धास्थानं तिथं मी जात असतो. पण, ती व्यक्तिगत बाब असते, असं शरद पवार म्हणाले.
लोकसभेआधी राहुल गांधी जनतेच्या न्यायालयात, १४ राज्यांतून जाणारी ‘भारत न्याय यात्रा’ कशी असेल? वाचा…
मविआची बैठक झालेली नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासह एकत्र बसू आणि निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. १४६ खासदारांना निलंबित केलं, त्यांची काय चूक होती. सदनात लोकं घुसली होती, ते लोक कोण होते त्यांची माहिती सरकारनं द्यावी, यासाठी विरोधकांनी आग्रह केला असता खासदारांचं निलंबन केलं. सभागृह सुरु असताना बाहेरचे लोक येतात, गॅस सोडतात यासंदर्भात प्रश्न विचारला तर निलंबन केलं जातं. संसद सत्ताधारी कशा प्रकारे चालवली जातेय याचं उदाहरण आहे, असं शरद पवार म्हणाले.
रोहित शर्मा सामना सोडून मैदानाबाहेर अचानक का गेला, जाणून घ्या खरं कारण….Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed