• Sun. Sep 22nd, 2024
वृद्धांना ‘टाटा’चा आधार, कॅन्सरबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभागाची सुरुवात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: योग्यवेळी निदान झाले तर कॅन्सरवर मात करता येते. मात्र उतारवयामध्ये कॅन्सर झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे अधिकच महत्त्वाचे ठरते. वयाच्या साठीच्या पुढच्या टप्प्यांमध्येही कॅन्सर झालेल्या रुग्णांवर योग्यवेळी व योग्य पद्धतीने उपचार केले तर त्यांनाही नव्या आयुष्याची भेट मिळू शकते, हे लक्षात घेऊन टाटा कॅन्सर रुग्णालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या जेरिअॅट्रिक ओपीडीची निर्मिती केली आहे. या विभागामध्ये वयोवृद्ध रुग्णांच्या नेमक्या वैद्यकीय, भावनिक गरजा ओळखून, वैद्यकीय निदान करून उपचार सुरू केले जातात. या विभागाला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपले, या भावनेतून हतबल होणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यामुळे आश्वासक आधार मिळाला आहे.

‘यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक कॅन्सर रुग्णांना उपचार देताना समान पद्धतीचा वापर करण्यात यायचा. लहान मुलांच्या वैद्यकीय गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे वयोगट आणि आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन उपचारांना प्रतिसाद देण्याची पद्धत वेगळी असते. ही बाब लक्षात घेता सरसकट ज्येष्ठ नागरिकांना जनरल ओपीडीमध्ये इतर रुग्णांसोबत उपचार का द्यायचे, असा विचार पुढे आला. कॅन्सर झालेल्या वयोवृद्धांना अनेकदा उपचारांची काय गरज आहे, असा सूरही आळवला जातो. त्यांच्यावर कोणते वैद्यकीय उपचार करायचे, हा निर्णय अनेकदा त्यांच्या मुलांकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतला जातो. या वयोगटातील रुग्णांच्या मनामध्येही आता जगून काय करायचे, अशी भावना असते. भावनिक, आर्थिक टप्प्यातील सर्व अडथळे पार करून कॅन्सरग्रस्त वयोवृद्धांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी टाटामध्ये सुरू करण्यात आलेले ज्येष्ठांसाठीचे मदत केंद्र उपयुक्त ठरले’, असा विश्वास टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक ( वैद्यकीय शिक्षण) डॉ. श्रीपाद बाणावली यांनी यासंदर्भात माहिती देताना व्यक्त केला.

काँग्रेसला विदर्भात धक्का; सुनील केदार यांची आमदारकी रद्द, जिल्हा बँक घोटाळा प्रकरण भोवलं

या वयोगटामध्ये डायबिटीज, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्येसह हृदयविकार, विस्मृती यासारखे सहआजार असतात. शारीरिक क्षमतांच्या मर्यादेसह मानसिक आरोग्यासंदर्भातही अनेक आव्हाने असतात. त्यामुळे उतारवयामध्ये वैद्यकीय उपचार करताना तीव्र की पॅलेटिव्ह उपचारपद्धतीचा वापर करायचा, याचा निर्णयही तज्ज्ञांकडून घेतला जातो.

आजार व्यवस्थापन विभाग

कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे, तो कोणत्या टप्प्यात आहे, त्याची लक्षणे कोणती आहेत, हे समजून वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाने आजार व्यवस्थापन विभाग (जेरिअॅट्रिक ओपीडी) सुरू केला आहे. वयोवृद्ध रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी असलेल्या विभागात विशेष प्रशिक्षित डॉक्टरांसह परिचारिकांची टीम आहे. कॅन्सरवरील उपचारपद्धतीमध्ये देण्यात येणाऱ्या केमोथेरपीसह इतर वैद्यकीय उपचारांची तीव्रता लक्षात घेऊन वैद्यकीय उपचार दिले जातात. इथे फार्माकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, सोशल वर्कर, आहारतज्ज्ञ यांचाही समावेश आहे.

सीओपीडी आजार का होतो? व हा आजार नियंत्रणात कसा ठेवाल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed