• Fri. Mar 13th, 2026
    शेतात यशस्वी प्रयोग! बाप-लेकाच्या कष्टाला लाखोंचे फळ; सेंद्रिय शेतीतून मिळालं मोठं उत्पन्न

    धुळे: हल्ली अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. त्याचबरोबर नवनवीन प्रयोगही केले जात आहे. धुळे तालुक्यातील देवभाने येथील पूनमचंद जयराम पाटील या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत त्यांच्याकडील १० एकर असलेल्या शेतील साडे चार एकरवर सेंद्रिय आवळ्याची शेती करत नवा पर्याय उभा केला आहे. यंदा या आवळ्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले असून इतर शेतकऱ्यांसाठी ते जिल्ह्यात प्रेरणादायी ठरत आहे.
    निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम
    धुळे तालुक्यातील देवभाने येथील शेतकरी पुनमचंद पाटील यांनी आपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. आपल्या कुटुंबाच्या साथीने तब्बल साडेचार एकरवर सेंद्रिय आवळ्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने गावाजवळ शेती आहे. या पिता-पुत्राने साडेचार एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीच्या ५०० हून अधिक आवळ्याच्या झाडांची लागवड केली आहे. ही झाडे काही वर्षांपूर्वीची असल्याने आता ती डेरेदार झाली आहेत. या झाडांपासून त्यांना आता आवळ्याचे उत्पादन मिळू लागले आहे. एका झाडापासून सरासरी ९० ते १०० किलो उत्पादन मिळत आहे. या सेंद्रिय आवळ्यापासून त्यांना पुढील चार महिन्यांत तब्बल १७ लाखांचे उत्पन्न दृष्टीपथात आहे.

    शेती मुंबई-आग्रा महामार्गावरच असल्याने अनेक ग्राहक थेट शेतात जाऊनच आवळ्याची खरेदी करीत आहे. शेताच्या बांधावर ५० रुपये प्रतिकिलो ने विक्री करीत आहे. तसेच पाटील कुटुंबाकडे गाई गुरांचा राबता असल्याने या सर्वांचा अधिवास शेतजवळच करण्यात आला आहे. त्या गायींना दररोज आवळ्याच्या झाडांच्या बुंध्याला बांधून तेथे त्यांचा चारा पाण्याची सोय केली जाते. त्यामुळे झाडाच्या अवतीभवती गायीचे मलमूत्र आणि शेणखत दररोज पडते. यामुळे आवळ्याच्या झाडांना कोणतेही रासायनिक खत आणि केमिकलयुक्त द्रव पदार्थ दिले जात नाही. सेंद्रिय पद्धतीने आवळ्याचे उत्पादन घेतले जात असल्यामुळेच आवळा झाडावर जास्त दिवस टिकून राहतो. आवळ्याची गुणवत्ता चांगली असल्याने उत्पादन देखील भरघोस मिळते. बाजारभाव देखील चांगला मिळतो. सेंद्रिय पद्धतीने आवळ्याचे उत्पादन घेतले जात असल्यामुळे ग्राहकांकडून याला मोठी मागणी आहे.

    शाळांची वेळ उशिरा करावी या राज्यपालांच्या सूचनेबाबत विद्यार्थी, शिक्षक अन् पालकांना काय वाटतं?

    पूनमचंद पाटील यांना सप्टेंबर ते जानेवारी या चार महिन्यांत १७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षा आहे. त्यातून ५ लाख २५ हजार खर्च वजा जाता त्यांना १२ लाख २५ हजार निव्वळ आवळा पिकापासून नफा अपेक्षित मिळण्याची आहे. आम्ही सेंद्रिय पद्धतीने आवळ्याचे उत्पादन घेतो. या आवळ्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे. आवळा हा आरोग्यवर्धक असल्याने ग्राहकांकडून त्याला मोठी मागणी आहे. शेतातच गायी असून दूध उत्पादनही घेतले जाते. त्यामुळे दुहेरी फायदा असल्याचे शेतकरी पूनमचंद पाटील यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed