मुंबई : नवाब मलिक महायुतीत नको हे सांगताना सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. याच भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोचणारे प्रश्न विचारले आहेत. महायुतीला पाठिंबा देणाऱ्या सरकारमध्ये अनेक नेते-मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तुमच्या देशात त्यांना मानाचे स्थान आहे काय? असा सवाल करत फक्त नवाब मलिक यांच्यावरच हल्ला का? अशी विचारणाच संजय राऊत यांनी केली आहे.
तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या नवाब मलिक यांच्या राजकीय भूमिकेकडे राज्याचं लक्ष होतं. आज महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून आपण अजितदादा गटाला पाठिंबा देत असल्याचं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं. त्यानंतर ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी भाजपवर हल्ला चढवला. दहशतवादाचे आरोप असलेले मलिक आता सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलेत? असा प्रश्न विचारून त्यांनी फडणवीसांना बॅकफूटवर ढकललं. देवेंद्र फडणवीस यांनीही पुढच्याच काही तासांत अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री नको, अशी भूमिका घेताना सत्तेपेक्षा आपल्याला देश महत्त्वाचा असल्याचं म्हटलं. दुसरीकडे फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देताना मलिक यांच्याशी आमची राजकीय चर्चा झाली नाही, ते आमचे सहकारी असल्याने त्यांच्याशी भेट होणं साहजिक आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांनी दिलं.संजय राऊत यांनी ट्विटमध्ये का म्हटलं?
तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या नवाब मलिक यांच्या राजकीय भूमिकेकडे राज्याचं लक्ष होतं. आज महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून आपण अजितदादा गटाला पाठिंबा देत असल्याचं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं. त्यानंतर ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी भाजपवर हल्ला चढवला. दहशतवादाचे आरोप असलेले मलिक आता सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलेत? असा प्रश्न विचारून त्यांनी फडणवीसांना बॅकफूटवर ढकललं. देवेंद्र फडणवीस यांनीही पुढच्याच काही तासांत अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री नको, अशी भूमिका घेताना सत्तेपेक्षा आपल्याला देश महत्त्वाचा असल्याचं म्हटलं. दुसरीकडे फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देताना मलिक यांच्याशी आमची राजकीय चर्चा झाली नाही, ते आमचे सहकारी असल्याने त्यांच्याशी भेट होणं साहजिक आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांनी दिलं.
राष्ट्रवादीच्या आरोप असलेल्या मंत्र्यांचा पाठिंबा चालतो मग नवाब मलिक का नकोत? बाकीच्यांना मांडीवर घेऊन त्यांच्यावरच हल्ला का? असं ट्विट संजय राऊत यांनी करून भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये का म्हटलं?
अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हते. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे XXX पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे.. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची…. असं बोचरं ट्विट राऊत यांनी केलं.