• Tue. Jun 16th, 2026

    अनिल देशमुख बैठकांना होते, त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, अजित पवारांचा गौप्यस्फोट

    अनिल देशमुख बैठकांना होते, त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, अजित पवारांचा गौप्यस्फोट

    रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं राष्ट्रीय अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडलं. या अधिवेशनानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली याला ईशान्य भारत, दिल्लीतून लोकं आले होते, असं अजित पवार म्हणाले. माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, सेलनी काय भूमिका घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

    अजित पवार म्हणाले की, मी कुणाचीही बदनामी करणारा माणूस नाही, कमी लेखणारा माणूस नाही. कुणाचीही प्रतारणा करण्याचा माझा प्रयत्न नाही, असं त्यांनी म्हटलं. आम्ही मंत्रिमंडळात गेल्यानंतर आमच्या नेत्यांनी वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानला बोलावलं होतं, असं अजित पवारांनी म्हटलं. काँग्रेसनं त्यावेळी आक्षेप घेतल्याचं ते म्हणाले.
    खर्रा खाण्यासाठी हजारोंची उधारी, पैसे मागताच तरुणाची सटकली, २३ वर्षीय पानठेलाचालकाचा खून
    आमच्या पक्षाची आरक्षणाबाबत, शेतकऱ्यांबाबत काय भूमिका आहे, अवकाळी पाऊस, एनडीआरएफची मदत यासंदर्भात भूमिका काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणं मतं मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, असं अजित पवार म्हणाले.

    अंजू खोटं बोलतेय? नसरुल्लाहनं सांगितलं अंजूच्या भारत वापसीचं खरं कारण; पतीकडूनच पोलखोल
    राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा, शिरुर, बारामती आणि रायगडमध्ये उमेदवार दिले जातील. इतर जागा असतील त्या मिळवण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार म्हणाले. इतरांचं आम्हाला काय घेणं देणं नाही, असं अजित पवार म्हणाले.

    मी कधीच खोटं बोललेलो नाही. खोटं बोलून काय करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले. अनिल देशमुख सगळ्या मिटींगला माझ्यासोबत हजर होते. अनिल देशमुखांनी मंत्रिमंडळात स्थान पाहिजे, असं सांगितलं होतं. मात्र, भाजपनं अनिल देशमुखांच्या नावाला नकार दिला होता. त्यांचं नाव कमी झाल्यानं ते आमच्यासोबत आले नाहीत, असं अजित पवार म्हणाले. महायुती म्हणून आम्ही सामोपचारानं जागा वाटपाचं काम करु, असं अजित पवार म्हणाले. देशात दंगली होणार नाहीत याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेतील, असं अजित पवारांनी सांगितलं.
    पार्थ पवारांचं राजकीय लाँचिंग, पण अजितदादांनी निवडलेल्या मतदारसंघावर चार ‘पक्षां’ची घारीसारखी नजर
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed