शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अवकाळीग्रस्त जिल्ह्यांचे तातडीने पंचनामे करा: मुख्यमंत्री शिंदे
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
