• Sat. Sep 21st, 2024

पुणे जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा…! शिरूर तालुक्यात गारांचा पाऊस, शेती पिकात शिरले पाणी

पुणे जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा…! शिरूर तालुक्यात गारांचा पाऊस, शेती पिकात शिरले पाणी

पुणे : शिरूर तालुक्यातील बेट भागात अवकाळी पावसाकने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या गारपिटीमुळे वाया गेली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

शिरूर तालुक्यात असणाऱ्या बेट भागामध्ये आज सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. बघता बघता पावसाने उग्र रूप धारण केले.अचानक वादळी वारे आणि गारांसह जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली. यामधे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून डांळीब बाग, कांदा रोपे, भाजीपाला पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी कांदा लावगडीसाठी रोपाची तयारी करीत होते, ही रोपे पूर्णपणे गारांच्या मारामुळे भुईसपाट झाली आहेत.
मराठा समाज आरक्षणात येणार, छगन भुजबळांकडून विषय भरकटवण्याचं काम, मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
मोठी मेहनत करून फुलवलेल्या डांळिंबाच्या कळ्यांचा सडा जमिनीवर पडला आहे . टाकळी हाजी , कुंड परीसर, सोदक वस्ती, रोहीलेवाडी, माळवाडी परीसरात गारांचा वेग मोठ्या प्रमानात होता प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असुन शेतीचे सर्रास पंचनामे करून बेटभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवानेते राजेंद्रदादा गावडे यांनी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास गारपीटीमुळे निसर्गाने हिराऊन घेतला असून, कांद्यांचे गेली दोन वर्ष होत असलेले नुकसान या मुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याला या निसर्गाच्या तडाक्याने जबर धक्का बसला आहे. या बाबत उपविभागीय प्रांत अधिकारी स्नेहल देवकाते – किसवे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मंडल अधिकारी तलाठी यांना दिले आहेत.

आमच्या हातातोंडाशीआलेले पीक या अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे. आमचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे. त्यामुळे आम्हाला भरपाई मिळावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी संजय बारहाते यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले, जागावाटपावर चर्चा नाही; फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले; कोणाला किती जागा?

जळगावातील चाळीसगावमध्ये गारपीट

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील काकळणे परिसरात तुफानी गारांसह अवकाळी पाऊस पडला. काही भागात शहरात हवा वादळ विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. या अचानक पावसामुळे शहरात तालुक्यातील कपाशी गहू हरभरा अशा इतर पिकांना या गावांच्या पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुफान गारपीट झाली आहेत.
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणात बदल, कांदा द्राक्ष पिकं संकटात
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed