• Mon. Mar 16th, 2026

    नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

    नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

    रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत असताना जीवावर बेतल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना कोकणातील गुहागर नरवण येथे घडली आहे. नारळ काढताना दुर्दैवीरित्या पडून मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यात नरवण येथे घडली आहे. आपल्या घराच्या बागेत नारळ काढण्यासाठी गेलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काशीराम आगरे यांचा दुर्दैवीरित्या पडून मृत्यू झाला आहे.

    २४ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे दुर्दैवी घटना आगरे यांच्या घराच्याच मागे असलेल्या बागेत घडली. घराच्या पाठीमागील मागील बाजूस असलेल्या नारळाच्या बागेमध्ये नारळ काढण्याकरिता घरी पत्नीला सांगून गेले होते. परंतु ते दुपारी एक वाजल्यानंतरही आले नाहीत म्हणून पत्नी बागेत इतका उशीर का झाला हे पाहण्यासाठी गेली. यावेळी तिला समोर दिसलेले दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली.

    घराबाहेर खेळणारी चिमुकली अचानक दिसेनाशी; फ्रॉक दिसताच कुटुंबाचा टाहो, नेमकं काय घडलं?
    काही वेळापूर्वी नारळ करण्यासाठी गेलेले चंद्रकांत आगरे नारळाच्या झाडाखाली जखमी अवस्थेत पडले होते. हा सगळा धक्कादायक प्रकार पाहून जीवाच्या आकांताने ओरडून पत्नीने हा प्रकार तात्काळ शेजारी व नातेवाईकांना कळविला. यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ जवळच्या नरवण प्राथमिक रुग्णालयात उपचारकरता दाखल केले. यावेळी आगरे हे नारळावरून पडल्याचे ग्रामस्थांच्या व पत्नीच्या लक्षात आले आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

    नरवण प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी आगरे यांना तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. गुहागर नरवण येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत होते. ते स्वतः रिक्षा चालकही होते मदतशील स्वभावाचे म्हणून ते सगळ्यांना परिचित होते. परिसरात त्यांना आप्पा या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या या अपघाती निधनाने नरवण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक ,राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी मुले असे कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

    शेतीतून समृद्धी, विषमुक्त अन्न हेच ध्येय; कोकणातील संशोधक शेतकरी दाम्पत्य कमावतं लाखोंचं उत्पन्न

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *