• Sat. Sep 21st, 2024

गोवा-मुंबई खासगी बस कोल्हापुरात उलटली, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

गोवा-मुंबई खासगी बस कोल्हापुरात उलटली, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कोल्हापूर: गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित १६ प्रवासी सुखरूप आहेत, तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्याभरातील कोल्हापुरातील बस अपघाताची ही दुसरी घटना आहे. मृत तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.

२५ प्रवासी करत होते प्रवास

कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड येथील पुईखडी येथे रात्री सव्वा दोनच्या सुमारास गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या व्ही.आर.एल. कंपनीच्या खाजगी स्लीपर बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये तब्बल २५ प्रवासी प्रवास करत होते. रात्री सव्वादोनच्या सुमारास ही बस राधानगरी येथील पुईखडी येथे आली असता यावेळी येथे असलेल्या वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या बाबतची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.

तुम्ही मटण खाऊन आलात म्हणून भारत मॅच हरला, लोखंडी रॉडने भावाची हत्या, वडिलांना जबर मारहाण
दरम्यान, महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. या अपघातात तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहेत. या अपघातात चार प्रवासी बसखाली अडकल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित १६ प्रवासी हे सुखरूप आहेत.

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या या खाजगी स्लीपर बसमध्ये तब्बल २५ प्रवासी प्रवास करत होते. मध्यरात्र असल्याने सर्व प्रवासी गार झोपेत होते. दरम्यान, ही गाडी पुईखडी येथे वळणावर आल्यानंतर बसचालकाचा बसवरील नियंत्रण सुटला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात दुर्देवाने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून यामध्ये नीलू गौतम (वय ४३), रिधिमा गौतम (वय १७), सार्थक गौतम (वय १३) सर्व जण राहणार पुणे अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या महिनाभरातील खाजगी बस अपघाताची कोल्हापुरातील ही दुसरी घटना असून गेल्या काही दिवसांपूर्वीच अशीच एक खाजगी बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस नदीपात्रात कोसळली होती.

सात दिवसांपर्यंत जिवंत दफन राहिला, बाहेर येताच ढसाढसा रडला, कारण काय?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed