गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाच धरण समूहातून जायकवाडीत ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीने सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.