• Wed. Sep 16th, 2026
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, ६ स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट नाही; ‘या’ वेळेत विक्री बंद

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : दिवाळीतील परतीचा प्रवास आणि छटपूजेनिमित्त उत्तर भारतातील रेल्वेगाड्यांना झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सहा रेल्वे स्थानकात मर्यादित वेळेसाठी फलाट तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकात संध्याकाळच्या वेळेस फलाट तिकीट उपलब्ध होणार नाही.

दिवाळी शेवटच्या टप्यात येताच उत्तर भारतीयांना छटपूजेचे वेध लागतात. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यात छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यामुळे मुंबईतून उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी आहे. ही गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाय राबवण्यात येत आहेत. रेल्वे स्थानकातील फलाटावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहा रेल्वे स्थानकांतील फलाट तिकीटविक्रीचा निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ अर्थात गुरुवारपासून करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत फलाट तिकीटविक्रीवरील बंधने कायम राहणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News: यारी रोड ते लोखंडवाला प्रवास निम्म्यावर, ट्रॅफिक जामच्या ठिकाणी नवा उड्डाणपूल
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि लहानमुलांसह असलेल्या एका व्यक्तीला यातून वगळण्यात आले आहे. एका व्यक्तीला फलाट तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

स्थानक – या वेळेत फलाट तिकीट विक्री बंद

सीएसएमटी – सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२.३०

दादर – सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२.३०

ठाणे – सायंकाळी ७ ते मध्यरात्री १.३०

कल्याण – सायंकाळी ६ ते मध्यरात्री १.३०

एलटीटी – सायंकाळी ६.३० ते मध्यरात्री १.००

पनवेल – रात्री ११.०० ते मध्यरात्री २.००

राज्यात रविवारपासून थंडी? मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये हुडहुडी भरणार; वाचा हवामान अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed