या प्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या रामलीला मैदानावर केलं होतं. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी अहमदनगर येथील जमीर शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या साक्षीने हिंदू धर्मात प्रवेश केला.
आम्ही अनेक वर्षापासून सनातन धर्माला पुजतो. आम्हाला सनातन धर्म आवडतो. यामुळे आम्ही आज आमच्या इच्छेनुसार धीरेंद्र शास्त्रींच्या साक्षीने हिंदू धर्मामध्ये घरवापसी करत असल्याचे शेख कुटुंबियांनी यावेळी सांगितले. धीरेंद्र शास्त्री यांनी या कुटुंबियांचं नामकरण देखील हिंदू पद्धतीने केलं आहे. यावेळी मी आता माझ्या मुलींचे लग्न हिंदू पद्धतीनेच करणार असल्याचे देखील यावेळी धर्मांतर केलेल्या जमीर शेख यांनी सांगितलं.
यावेळी बागेश्वर धाम यांनी पुढील काही दिवसांमध्ये आणखी दहा कुटुंब छत्रपती संभाजी नगर शहरातील हिंदू बांधवांना घरवासी करून भेट देणार असल्याचं सांगितलं. धर्मांतर केल्यानंतर शेख कुटुंबीयांनी बागेश्वर यांचे आभार मानले. दरम्यान बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी तीनही दिवस छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांनीनी गर्दी केली होती. त्यामुळे मी लवकरच पुन्हा छत्रपती संभाजी नगरला येईल, असं आश्वासनही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शहरवासियांना दिले.