• Sat. Sep 21st, 2024

Satara Rain :साताऱ्यात पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार, शेतकऱ्यांना दिलासा

Satara Rain :साताऱ्यात पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार, शेतकऱ्यांना दिलासा

सातारा : पुसेगाव परिसरात दमदार पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेले तीन दिवसाचे ढगाळ वातावरणानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता पावसाने सुरुवात केली. सुमारे एक तास पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसरामध्ये पाणीच पाणी केले असून रब्बी पिकाला जीवदान देणारा हा पाऊस असल्याने पुसेगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती, खरिप पिकानंतर आता रब्बी पिकाला पावसाची गरज होती. खरिप हंगामातील पीक पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे हातात आले. केवळ पावसाच्या कमतरतेमुळे उत्पन्नात मोठी घट झाली होती. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी थोडाफार पाऊस पडेल या आशेवर पेरण्या केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा ही पिके येतात. काही शेतकरी रब्बी हंगामात बटाट्याची लागवड देखील करतात. खरिप पिके ही नगदी पैशाची पिके असून, रब्बी पिकावर माणसाचे वर्षाचे वर्षभराचे अन्नधान्याचे साधन असते. या रब्बी पिकावर शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य लोकांचे जीवनमान अवलंबून असते.
निवडणुकीच्या तोंडावर भीक नको, कायमस्वरूपी हक्क हवा,मोफत धान्य वाटप योजनेवर अन्न अधिकार अभियानाची भूमिका
रब्बी हंगामात हा पहिलाच दमदार पाऊस पडल्याने रब्बी पिकास फार उपयुक्त आहे. यासारखे अजून दोन-चार पाऊस पडल्यास, रब्बी पीक हाती लागून बऱ्याचअंशी अनेक प्रश्न सुटण्यास मार्गी लागणार आहेत. त्यामध्ये जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, याच रब्बी पिकावर व इथून पुढे पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. आज पडलेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व सुखावह वातावरण निर्माण झाले आहे.

औंध परिसरामध्ये औंध, गोपूज, पळशी, खरशिंगे, गोसाव्याचीवाडी, खबालवाडी, नांदोशी तर पुसेगाव परिसरातील पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये सुमारे एक तास मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता.
मराठा-ओबीसी आरक्षणावरून मंत्री भिडले, शिंदे-फडणवीस चिडले, अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून मंत्र्यांना झापलं
आज सकाळपासूनच सातारा, कराड, मान परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर साडेदहा वाजता पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यामुळे नोकरी व्यवसायनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडाली. साताऱ्याच्या पश्चिम भागातील जावळी, महाबळेश्वर, वाई फलटण तालुक्यात वातावरण ढगाळ असून शेतकरी अवकाळी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपूर्वी देखील साताऱ्यात पावसानं हजेरी लावली होती.
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे गणित झाले सोपे, पाहा कोणाला सर्वात चांगली संधी..

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed