• Mon. Mar 16th, 2026

    पुण्यात बटाट्याचा पाला खायला दिल्यानं ४० गाईंना विषबाधा, २० गाईंचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

    पुण्यात बटाट्याचा पाला खायला दिल्यानं ४० गाईंना विषबाधा, २० गाईंचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

    पुणे: आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गाईंचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात १६ मोठ्या गाई आणि ४ कालवडींचा समावेश आहे. तर ३० ते ४० गाईंना विषबाधा झाली आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गाईंच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संबधित व्यक्तीचे ५० ते ६० लाखांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे जवळपास १५० गाई, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्रिकरुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. तसेच निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पाथ व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांचे गायांना खाण्यासाठी घेऊन येत असतात.
    अँजेलो मँथ्यूजने कोणाचीच उधारी ठेवली नाही; काही तासातच घेतला टाइम आउटच्या सूत्रधारांचा बदला
    दोन दिवसांपूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गायींना विषबाधा झाली आणि आतापर्यंत २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. तर ३० ते ४० गाईही मरणाच्या दारात आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गाईंवर औषध उपचार सुरु आहेत.

    राजस्थानी व्यावसायिक हे गेल्या अनेक वर्षापासून या भागात वास्तव्य करत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गाईच आहेत. त्यांच्या गाया दगावल्याने त्यांचे अंदाजे पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
    मुंबईतील सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघ पोहोचला इरफान पठाणच्या घरी; सुनील शेट्टी, हरभजनसोबत केली पार्टी
    निरगुडसर गावचे तलाठी पी एम मुगदळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तळेकर, सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोरके, विक्रम मेंगडे, हरिश सुडके यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पाहणी केली असून मदत करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    मविआच्या काळात ब्रिस्क कंपनीवरुन भाजपचे आरोप आता कंत्राट कसं दिलं? रोहित पवारांसह रोहिणी खडसेंचा सवाल

    आढळरावांनी गाव अन् गाव पिंजून काढलं, वळसे पाटलांचा स्वत:च्या होमग्राऊंडवर पराभव, नेमकं काय घडलं?

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *