• Sat. Sep 21st, 2024
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या तरुणावर ऑईल फेकलं, बेदम चोपही दिला

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रुप घेतल्याचं दिसून आलं. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही अशीच घटना घडली आहे. आम्ही ९६ कुळी मराठा आहोत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको म्हणणाऱ्या तरुणावर मराठा आरक्षण आंदोलकांनी ऑइल टाकलं आहे, याशिवाय त्याला उठाबळा देखील काढायला लावल्या.

प्रताप कांचन या तरुणाने तो ९६ कुळी आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको असं विधान केलं होतं. या तरुणाला सोलापूरमधील मराठा आरक्षण आंदोलकांनी उत्तर दिलं आहे. प्रताप कांचन या तरुणांच्या अंगावर मराठा बांधवांनी ऑइल टाकलं आहे.

प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी मराठा प्रमाणपत्राला विरोध केला होता. प्रताप कांचन यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पैसे घेऊन अशा पद्धतीची विधान केली असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी मनोज जरांगे पाटील गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, असं म्हटलं. इतर संघटना देखील आंदोलन करत आहेत. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असल्याचं कुणबी प्रमाणपत्र नको असल्याचं सांगितलं. त्यामुळं ऑइल टाकल्याचं राम जाधव यांनी म्हटलं.

सोलापुरातील आक्रमक मराठा बांधवांनी प्रताप कांचन या तरुणाला उठाबशा देखील काढायला लावल्या आहेत. प्रताप कांचन या तरुणाला मराठा आंदोलकांनी जाब विचारला. यावेळी प्रताप कांचनने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची माफी मागितली आहे.
भारतीय संघासाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज; सेमीमधील स्थान निश्चित होण्याआधी रोहित शर्माची चिंता मिटली

बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण

मराठा आरक्षण आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागलेलं आहे. आज बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यानंतर माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीत देखील आग लावण्यात आली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या घराला देखील आग लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय देखील पेटवण्यात आल्याची माहिती आहे.
भारताच्या विजयानंतर समोर आला सुंदर योगायोग, शतकांच्या धडाक्यात भारताचा शंभर नंबरी विजय
दरम्यान, जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, जाळपोळ करु नये, असं आवाहन केलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाळपोळीच्या घटना घडत आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
विराट कोहलीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी, ७० हजार चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट

कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक, जरांगे पाटलांना पाठिंबा देत सदावर्तेंना सुनावलं

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed