• Tue. Jun 9th, 2026
    गरबा खेळताना भोवळ येऊन पडला, ऐन नवरात्रात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    नाशिक : मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरब्याची परवानगी असताना रविवारी (दि. २२ ऑक्टोबर) रोजी उशिरापर्यंत गरबा खेळत असताना भोवळ येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र अशोक खरे (वय ३६, रा. त्रिमूर्ती चौक) असे या तरुणाचे नाव आहे.

    हा तरुण महात्मानगर परिसरातील संत कबीरनगरात गरबा खेळत असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

    ‘वाघ बकरी चहा’ फेम पराग देसाईंचे निधन, भटक्या कुत्र्यांपासून वाचताना पडल्याने ब्रेन हॅमरेज
    नवरात्रोत्सवाच्या अखेरीस शहरात सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र खरे रात्री गरबा खेळण्यासाठी संत कबीरनगर परिसरात आला होता. साडे अकरा वाजताच्या सुमारास भोवळ आल्याने तो कोसळला.

    दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे अपघाती निधन, गाडीचे चाक डोक्यावरुन गेल्याने गतप्राण
    त्याला त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे अडीच वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरात मर्दानी आखाड्यात शिवकालीन शस्त्रास्त्रांची पूजा

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed