• Sat. Sep 21st, 2024
पक्षफुटीच्या वेळेस ढसाढसा रडले; आता उद्धव ठाकरेंना पत्र लिहून जिल्हाप्रमुखाची सोडचिठ्ठी, म्हणाले…

डोंबिवली: ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसे पत्र पण दिले आहे. पदाला न्याय देता येत नसल्याने हा राजीनामा शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख यांच्याकडे दिल्याची माहिती थरवळ यांनी दिली असून तरी मी शेवटपर्यंत शिवसैनिकच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा कल्याण-डोंबिवलीत रंगली आहे. तर कल्याणमधील जेष्ठ शिवसैनिक आणि महानगरप्रमुख बंड्या साळवी यांना उपनेते पद दिल्याने थरवळ नाराज झाल्याची चर्चा आहे.
PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन
पक्षाचे दोन गट झाल्यानंतर थरवळ डोंबिवलीत झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात ढसाढसा रडले होते. थरवळ यांनी एकीकडे जिल्ह्याचे नेतृत्व, तर दुसरीकडे पक्षवाढीसाठी दिलेला जोर हा शिवसेना ठाकरे गटाला पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला होता. आता थरवळ यांच्या जिल्हा प्रमुखाच्या राजीनाम्यानंतर ठाणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. दरम्यान या सर्वं चर्चावर थरवळ यांनी सांगितले की, तुमच्याकडे पत्र मिळालेले आहे, कुठून मिळाले मला माहिती नाही. पण त्याच्यात मी लिहिलंय की आमच्या पक्षप्रमुखांना अपेक्षित असलेले काम माझ्याकडून होते असं मला वाटत नाही म्हणून मी त्या पदाचा राजीनामा देतो आहे. ज्या काही चर्चा होत आहे, अशा चर्चा २०१० आणि २०१५ ला राज ठाकरे ज्या वेळेला डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांना भेटलो, त्यावेळेला बरेच चर्चा रंगल्या. मात्र तसं काही झाले नाही.

ते पुढे म्हणाले की, मी गेले ४३ वर्ष डोंबिवलीतून शिवसेनेसाठी काम करत आहे. त्यामुळे मी जिथे आहे तिथेच आहे. मी पदाचा राजीनामा दिला. मी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे. माझ्याकडे तीन विधानसभा आहे. कळवा-मुंब्रा, कल्याण ग्रामीण, डोंबिवली या तिन्ही ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. नागरिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकंदरीत दोन वेळा मी शहर प्रमुख होतो. तिसऱ्यांदा देत होते मात्र मी घेतलं नाही. या लोकसभेला असलेले महत्त्व पुढच्या दृष्टीने म्हणून मला असं वाटलं की पक्षाला अपेक्षित असलेलं काम माझ्याकडून होतं नाही. हेच या मागचं कारण आहे. बरेच लोकांचे तसेच नेते मंडळींचे फोन येऊन गेले. आत्ताच गुरुनाथ खोत यांचा फोन येऊन गेला. खा. विनायक राऊत यांच्यासह सर्वांचे फोन आलेले आहेत. त्यांच्याशी मी बोललेलो आहे. कोणी काय चर्चा करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान यावर आता शिवसेना शिंदे गटातील युवानेते आणि सचिव दिपेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हात्रे म्हणाले की, अनेक शिवसैनिक अशाच पद्धतीने या नेतृत्वावर नाराज होते. त्याच शिवसेनिकांचं प्रतिनिधित्व करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आवठाव केला आहे. अनेक शिवसैनिक अजूनही नाराज आहेत. शिवसैनिकांची काम होत नाही. अनेक शिवसैनिकांना मानसन्मान दिला जात नाही. भेटी दिल्या जात नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत आणि दसरा मेळाव्याच्या आधी अनेक शिवसैनिक शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बाळासाहेबांचे विचार घेऊन आमच्याकडे येण्याची शक्यता आम्हाला वाटते आणि आपण बघत असाल तर शिंदे साहेबांनी जो उठाव केला होता, त्याचा जो वणवा आहे, तो असाच पेटत राहणार आहे. दुटप्पी राजकारण नेहमी होत राहतं. अनेक चांगले शिवसैनिक त्यांना डावललं जातं, त्यामुळे नाराजी तयार होत असते. पुढच्या काळात अनेक जुने शिवसैनिक आहेत. शिंदे साहेबांबरोबर जोडले जाणार आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार, असे म्हात्रे यांनी सांगितले…
जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन, चिठ्ठीही लिहिली!
दरम्यान, पक्ष प्रमुख ठाकरे हे थरवळ यांचा राजीनामा स्वीकारतील की पुन्हा त्यांची समजूत काढतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षवाढीसाठी ठाणे जिल्ह्यात थरवळ यांचा चेहरा महत्त्वाचा असल्याने त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यात थरवळ शिंदे गटात प्रवेश करतात का हे पहावे लागेल.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed