मला माझ्या वडिलांची काळजी आणि आरक्षणाचीही : पल्लवी जरांगे पाटील
जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सोळा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यानंतरच आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाने शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन केले होते. जालना येथे झालेल्या समाज बांधवांवर लाठी हल्ल्याचा निषेध आणि समाजाला आरक्षण मिळण्याच्या समर्थनार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजाच्या वतीने पाच तरुणींनी आपले निवेदन दिले. या मोर्चा साठी बुलढाण्यात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या कन्या पल्लवी पाटील हिने माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी तिला आंदोलनाबाबत विचारले असता तिने मला माझ्या वडिलांची आणि आरक्षणाची देखील काळजी असल्याचे बोलले आहे. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत. त्यामुळे सरकारने आम्हाला आरक्षण त्वरित द्यावे असेही तिनं पुन्हा एकदा सरकारला ठणकावलं आहे.
आम्ही मराठा असून पेठून उठलेलो आहोत, आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकारला पण याची दखल घ्यावी लागेल, असं पल्लवी जरांगे म्हणाले. वडील आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत, असा विश्वास पल्लवी जरांगे हिनं व्यक्त केला. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला माझा बाप हवाय, असंही ती म्हणाली.