• Sat. Sep 21st, 2024
चिमुकला नवीन घरात जातो सांगून बाहेर पडला; नंतर जे घडलं ते पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

नागपूर: वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रावणनगर येथे एका १२ वर्षीय मुलाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षित कृष्णकुमार नायडू असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. नवीन घरात खेळायला जातो, असे सांगून तो घरातून गेला. तो परतलाच नाही.
आधी जेवणावरून वाद; नंतर भंडाऱ्याचा एकत्र आस्वाद, रात्री पुन्हा वाजलं, अन् सगळं संपलं
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार नायडू यांच्या श्रावणनगर येथील घराचे बांधकाम सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा घराचा स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी हर्षित हा त्याचा घरी अभ्यास करत बसला होता. सायंकाळी हर्षितने त्याच्या आईला नवीन घरात खेळायला जात असल्याचे सांगितले. बराच वेळ होऊनही हर्षित घरी परतला नाही. त्यामुळे हर्षितची आई काळजी करत होती. रात्री आठच्या सुमारास त्याचे वडील कृष्णकुमार नायडू हे त्याचा शोध घेत असताना त्यांचा बांधकाम सुरू असलेल्या नवीन घरी गेले. तिथे हर्षित लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हर्षितने एका रूममध्ये लाकडी फळीला ओढणी बांधून गळफास घेतला होता.

आमचं सरकार फेविकॉलचा मजबूत जोडा, फडणवीस-अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शिंदेंचं स्पष्टीकरण

हे पाहताच नायडू त्यांचा पायाखलील जमीनच सरकली. त्यानंतर कृष्णकुमार नायडू यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने फास काढून त्याला खाली उतरविण्यात आले. तात्काळ हर्षितला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय सुचनेवरून वाठोडा पोलीसांना याची माहिती देण्यास आली. मात्र हर्षितने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed