जालन्यातील शहागड येथे आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अलटीमेटम दिला होता. पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ईशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता, त्यात आज्ञात समाज कंटकांनी दगड फेक केली. त्यात काही पोलिस अधीकारी कर्मचारी महीला कर्मचारी आणि गावकरी देखील जखमी झाले.
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने महिला आंदोलक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. तर आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांच्या वतीने दोन बस जाळण्यात आले असून दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक सुद्धा जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. औरंगाबाद सोलापूर महामार्गावर तीन ते चार बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे.
जालन्यातील लाठीचार्जचे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम
मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यावर झालेल्या लाठीचार्जनंतर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहने जाळण्याच्या घटना उघडकीस येत असल्यामुळे एसटी महामंडळातर्फे खबरदारी घेण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर सिडको बसस्थानकांवर बीड कडे जाणारे बस थांबवण्यात आले आहेत. तर पाचोड बसस्थानक येथे बीडकडे जाणाऱ्या बस थांबवल्या आहेत. खबरदारी म्हणून अचानक थांबवण्यात आलेल्या बस मध्ये असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.