• Sat. Sep 21st, 2024

साप बिळातून बाहेर पडलेत, कोल्हापूरचं प्रसिद्ध पायताण दाखवायची वेळ आलीय: जितेंद्र आव्हाड

साप बिळातून बाहेर पडलेत, कोल्हापूरचं प्रसिद्ध पायताण दाखवायची वेळ आलीय: जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमान सभा कोल्हापूरमध्ये सुरु आहे. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती, कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली दंगल, पक्षातील काही नेत्यांनी सोडलेली साथ आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीवर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरकरांसमोर भाषण करायची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. यापूर्वी आमचं नाव अचानक कट व्हायचं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

शरद पवारांच्या आजच्या सभेबद्दल बोलताना कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादना भेटायला आमचा वस्ताद आला आहे. आमचा वस्ताद भयंकर आहे ते कुस्ती खेळणार का म्हणतात त्यानं समोरच्या व्यक्तीची अवस्था बिकट होते, असा टोला जितेंद्र आव्हाड ायंनी लगावला.

नवीन पिढी ला शाहू महाराज कोण संमजून सांगायला हवं आहे. संविधान म्हणजे शाहू महाराज ही ओळख आहे. एकदा अंगावर घेतलं की सोडायचं नाही शाहू महाराजांनी आपल्याला शिकवलं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कोल्हापुरात दंगा झाला त्यावेळी पोलिसांकडून माहिती घेतली तर समजंल की पोलिसांना नाकाबंदीची ऑर्डरचं मिळाली नव्हती. रात्री १० वाजेपर्यंत पोलीस नाकाबंदीची वाट बघत होते पण मात्र बाहेरून गाड्या आल्या आणि दंगा करून गेले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसोबत केलेल्या आघाडीबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं. प्रबोधनकार ठाकरेच हिंदुत्व हे आम्हाला मान्य आहे.. मात्र तुमचं हिंदुत्व मान्य नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शिवसेनेचे हिंदुत्व हे मानवतावादी आहे तुमचं हिंदुत्व दुही पसरवणारं आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.
चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार; मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार

निवडणुकीत पिक्चर क्लियर होईल; जितेंद्र आव्हाडांचे अजितदादा गटाला टोले

गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते ते आता समोर आलं आहे. साप आता बिळातून बाहेर पडले आहेत. त्यांना पायताण दाखवण्याची वेळ आली आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
भाजपला भीमटोला द्या… दिल्लीला महाराष्ट्राची ताकद दाखवून द्या, रोहित पाटलांनी सभा गाजवली
सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयुक्त म्हणून तीन सदस्यांची समिती सुचवली होती. त्यात सरन्यायाधीश देखील होते. त्यात बदल करण्यात आले तिथं सरन्यायाधीशांच्या जागी ज्येष्ठ मंत्र्याची नियुक्ती करण्याबाबत कायदा करण्यात आली. दिल्लीच्या बाबत तसाच प्रकार घडला. राज्यात तलाठी भरतीला शेतकऱ्यांच्या पोरांकडून एक हजार रुपये घेत आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांच्या साथीनं ही फी घेणाऱ्यांविरोधात लढायचं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांचे विचार चालतील. महाराष्ट्रात भिडे चे विचार चालणार नाहीत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
बीसीसीआयने सौरव गांगुलीवर दिली मोठी जबाबदारी, Word Cup 2023 साठी आता करणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed