• Sat. Sep 21st, 2024
समाजासाठी काही वेगळं करण्याची उमेद; त्या दृष्टीने निवडला मार्ग, अन् तरुणानं थेट…

अमरावती: हि गोष्ट अभिजित रामदास काळे याची आहे. तो संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी तो राष्ट्रीय सेवा योजना आणि त्याद्वारे करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाविषयी वृत्तपत्रातून बातम्या वाचत असतो. त्याला सुद्धा समाजासाठी काही तरी करायचे होते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्याची हि इच्छा पूर्णत्वास गेली ती राष्ट्रीय सेवा योजनेमुळे. तो सांगतो की, संत गाडगेबाबा विद्यापीठचे रा.स.यो. संचालक डॉ. राजेश बुरंगे सर यांनी वेळोवेळी केलेले मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच तो एक चांगला रा.स.यो.
स्वयंसेवक बनू शकला.
चांद्रयान-३ मध्ये खामगावचा बहुमूल्य वाटा; बुलढाण्याची मान गर्वाने उंचावली, जाणून घ्या कारण
इथे काम करत असताना त्याचातील नेतृत्व गुण सिद्ध करण्याची संधी त्याला मिळाली. या संधीचा सोन करण्याची धडपड असल्यामुळे तो इतर विद्यार्थ्यांसोबत
पर्यावरण जनजागृती, वृक्षरोपण, बालविवाह जनजागृती अश्या विविध उपक्रमात सहभागी होत रहिलो. विद्यापीठाकडून आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेत मला प्रथमच नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असे तो म्हणाला. त्याने केलेल्या कामाची पावती म्हणून डॉ. बुरंगे सर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याचा सत्कार देखील केला. या कौतुकातून प्रेरणा घेऊन आणखी चांगले काम करण्याची उर्जा त्याला नक्कीच मिळाली. या नंतर तो राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबीर जे चिखलदरा येथे आयोजित करण्यात आले होते. त्याच्या आयोजनात त्याला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या कार्याचे कौतुक आणि सन्मान तत्कालीन रा.स.यो. राज्य संपर्क अधिकारी डॉ. वनंजे सर यांनी केले.

यातूनच पुढे त्याला सकाळ माध्यम समूहाकडून आयौजीत यंग इन्सपीरेटर नेटवर्कच्या निवडणुकीला सामोरे जावून शाडो क्याबिनेट मध्ये सहभागी होता आले.
तो म्हणाला की, या सर्व उपक्रमात त्याच्या सर्वात जवळचा आणि महत्वाचा उपक्रम म्हणजे केंद्र सरकार संचलित जलशक्ती अभियान अंतर्गत संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला पंजाबराव देशमुख अमृत सरोवर निर्मिती प्रकल्प. अमृत सरोवर प्रकल्प निर्माण करण्याकरिता औचित्य ठरले ते राष्ट्रीय सेवा योजनेचे ७ दिवसांचे विशेष निवासी शिबीर. हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील राजुरा बाजार इथे प्रस्तावित होता. या प्रकल्पात मला रा.से.यो. मुळे काम करण्याची संधी मिळाली. २०१८ साली वरुड तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसलेल्या आहेत.

लोकार्पण सोहळ्यापूर्वी शरद पवार श्रीनाथ म्हस्कोबा चरणी नतमस्तक

त्याकाळात प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमीर खान यांनी भेट देऊन वॉटर कप स्पर्धा आणि महाराष्ट्र शासनाच्या जालयुक्त शिवार अभियानासाठी प्रमोशन केले
होते. अशा दुष्काळग्रस्त भागात काम करण्याची त्याला संधी मिळाली होती. त्या ७ दिवसाच्या शिबिरात तो आणि इतर सर्वांनी मिळून १ एकर जागेवर अमृत
सरोवर तयार केला. आज या तलावात पावसाच्या पाण्याची साठवणूक होत आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना हा प्रकल्प स्थानिक गावकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. अभिजित म्हणतो की, या सामाज उपयोगी उपक्रमात त्याला राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सहभागी होता आले. तो याचे श्रेय तो डॉ. राजेश बुरंगे सर यांना देतो. “रा.से.यो. मुळे माझ्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला आणि समाजासाठी काही तरी करण्याचे समाधान मिळाले. खऱ्या अर्थाने ‘नॉट मी बट यु’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणता आले”, असे तो अभिमानाने सांगतो.
UPSC ची तयारी करताना तरुण बनला कृषी उद्योजक, दुग्ध व्यवसाय सुरु केला अन् लाखोंची कमाई
“अमृत सरोवर प्रकल्प निर्माण करण्याकरिता औचित्य ठरले ते राष्ट्रीय सेवा योजनेचे ७ दिवसांचे विशेष निवासी शिबीर. हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील वरुड
तालुक्यामधील राजुरा बाजार इथे प्रस्तावित होता. या प्रकल्पात मला रा.से.यो. मुळे काम करण्याची संधी मिळाली”. २०१८ साली वरुड तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसलेल्या आहेत. त्याकाळात प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमीर खान यांनी भेट देऊन वाटर कप स्पर्धा आणि महाराष्ट्र शाशनाच्या जालयुक्त शिवार अभियानासाठी प्रमोशन केले होते. अशा दुष्काळग्रस्त भागात काम करण्याची त्याला संधी मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed