दरम्यान पोलीस उपायुक्त (झोन X) डी नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्तींविरोधीत भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गंभीर दुखापत करणे आणि धमकी देण्यासंबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जोगेश्वरी पोलिसांनी अशी माहिती दिली की, ते आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून घटनेविषयी अधिक तपास सुरू आहे.
अभिषेक यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, विलेपार्ले याठिकाणी असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तो त्याच्या मैत्रिणीला घरी सोडण्यासाठी निघाला होता. पहाटे ३.४० च्या सुमारास शंकरवाडी बस स्टॉपजवळ त्याच्या बीएमडब्ल्यूसमोर एक कार अचानक येऊन थांबली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा बसस्टॉप आहे. त्याने TOI शी बोलताना असे म्हटले की, ‘पुढच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने मला थांबण्याचा इशारा केल्यानंतर मी गाडी थांबवली. तो त्याच्या कारमधून बाहेर पडला आणि माझ्या कारवर विनाकारण मारायला सुरुवात केली. जेव्हा मी खिडकी खाली केली, तेव्हा त्याने मला शिवीगाळ केला.’
मलिक असेही म्हणाले की, जेव्हा त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी ते त्यांच्या कारबाहेर पडले तेव्हा संबधित आरोपीने त्यांच्या कानखाली मारली. त्यावर त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यांनी पुढे असे म्हटले की, ‘यानंतर कारमधील इतर दोन माणसे खाली उतरली आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळही केली, माझ्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिलाही धक्काबुक्की केली आणि लाथ मारली.’ मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार यानंतर ते निघून गेले.
मलिक आणि त्यांची मैत्रीण आधी आंबोली पोलीस ठाण्यात गेले होते. त्याठिकाणी दोघांवर प्राथमिक उपचार केले गेले आणि नंतर घटनास्थळी नेण्यात आले. आंबोली पोलील त्यांना यानंतर जोगेश्वरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले, कारण जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करत आहेत.