या प्रकरणात पोलीसांनी मृतदेह हा अकोले तालुक्यात सापडल्याने तेथील गावागावात महिलेच्या ओळखीसाठी एक मेसेज तयार करुन व्हायरल केला. मात्र तरी देखील शोध लागला नाही. त्यानंतर एलसीबीची टिम थेट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेली. तेथील अधिकार्यांकडून या सॅनिटरी पॅडची माहिती घेतली.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या आशा सेविका, अंगणवाडी ताई अशा काही गृपवर हे पोलिसांचे मेसेज व महिलेचा फोटो पाठविण्यात आला. त्यानंतर वांबोरी येथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निश्चित झाले आणि पुढील तपासाला दिशा मिळत गेली.
कल्याणीचे लग्न जिल्ह्यातील राहुरी वांबोरी येथे राहणाऱ्या महेश जाधवशी झाले होते. मात्र महेश आपल्या पत्नीवर संशय घेत असे. त्यातूनच त्याने आपला भाचा मयूर अशोक साळवे (रा. राहुरी) याला बरोबर घेऊन पत्नी कल्याणीला भंडारदरा परीसरात फिरायला घेऊन गेला आणि कातळापूर परीसरात निर्जनस्थळी तिचा गळा आवळून खून करुन मृतदेह तिथेच टाकून पसार झाला होता.
मात्र एका सॅनिटरी पॅडमुळे या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी महेश आणि त्याचा भाचा अशोक साळवेला अटक केली आहे. त्यांनी गुन्हाही कबूल केल्याच पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, अहमदनगर एलसीबीच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.