• Fri. Jun 12th, 2026
    महापालिकेचे प्रभागाकडे दुर्लक्ष; नागरिकांची आमदारांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक

    धुळे: मुलभूत सोयी-सुविधांच्या बाबतीत तब्बल २५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या धुळे शहरातील नगावबारी परिसराकडे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे नगावबारीचा प्रभाग क्रमांक दोन दत्तक घेण्याचा निर्णय आमदार डॉ. फारुक शहा यांनी घेतला आहे. या परिसरातील एका रस्ते कामाचा शुभारंभ करताना त्यांनी तशी घोषणा केली.
    अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेनं राजकीय वातावरण तापलं, जयंत पाटील मीडियासमोर येत म्हणाले…
    धुळे महानगरपालिका क्षेत्रात सोयी-सुविधा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन कल्याणी बंगला ते केंद्रीय विद्यालय, डॉ. महेंद्र वाढे यांचे निवासस्थान ते केंद्रीय विद्यालयपर्यंत रस्ता कामाचा शुभारंभ आमदार फारुक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहरात सुमारे २५ ते ३० वर्षांपासून वसलेल्या कॉलनी आणि झोपडपट्ट्यांमध्ये रस्ते, गटारी नसल्यामुळे येथील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष हे कुचकामी ठरलेले आहेत. दरम्यान, धुळे शहराचे आमदार डॉ. फारुक शहा यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडायला सुरुवात केली आहे.

    झुरळांच्या सुळसुळाटामुळे प्रवासी हैराण, पनवेल-नांदेड रेल्वे पुणे स्थानकावर थांबवली

    आमदार फारुक शहा यांनी धुळे शहरातील अनेक भागात रस्ते आणि गटारीसाठी तसेच मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त करून घेतला आहे. त्यातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या रस्ते कामाचा शुभारंभ आमदार फारुक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराला धुळेकर नागरिक कंटाळले आहेत. सत्ताधारी नगरसेवक तसेच पदाधिकारी फक्त शहरातील नागरिकांच्या कररुपी पैशांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र आमदारांच्या प्रयत्नांमुळे आज अनेक भागात विकासकामे सुरू आहेत. तसेच शहरातील प्रभाग क्रमांक दोनचे विकास कामे होत नसल्यामुळे आमदार डॉ. फारुक शहा यांनी संपूर्ण प्रभाग दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. धुळे महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता असून देखील पदाधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांपासून धुळेकरांना विकासापासून वंचित ठेवले आहे. हे धुळेकर जनता जाणून आहे. येत्या निवडणुकीत मतदार त्यांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला.

    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद
    महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed