• Sat. Jun 6th, 2026
    ठाण्यापल्याड स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार, प्रवाशांना सुखसुविधा मिळणार; ‘या’ स्थानकांचा समावेश

    ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये ठाण्यापलीकडील मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून या स्थानकांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. या योजनेतून प्रत्येक स्थानकाच्या विकासासाठी सुमारे २० कोटी निधी मिळणार आहे. पुढील एका वर्षामध्ये या स्थानकांचा विकास पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिली.

    ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांपैकी मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची सातत्याने मागणी केली जात असली तरी त्यांना आवश्यक निधी मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अमृत भारत रेल्वे स्थानक योजना सुरू करण्यात आली असून रविवार ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने सर्व स्थानकांच्या कामांचे भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

    Mumbai News: मुंबईतील ‘या’ तीन रेल्वे स्थानकांचा विकास; कोट्यवधी रुपयांचा खर्च, रेल्वे महाव्यवस्थापकांची माहिती
    या स्थानकाची इमारत, तिकीट खिडक्यांचा परिसर, प्रवेशद्वार, पादचारी पूल, उद्यान, स्वच्छतागृह, पाणपोई, विद्युतीकरण, सुचना फलक, ध्वनिक्षेपण व्यवस्था, स्वच्छता, स्टॉलचे नियोजन, सरकते जिने या सगळ्याचा विकास करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रवाशांनीही आपल्या सूचना पाठवणे आवश्यक असून या भागातील प्रवाशांनी त्यांना हव्या असलेल्या बदलांबद्दल रेल्वे प्रशासनाला कळवण्याचे आवाहन रेल्वेकडून कऱण्यात आले आहे. यावेळी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप पोल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन उपस्थित होते.

    Mega Block : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट, उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, जाणून घ्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *