ही गोष्ट वळसे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः नागरिकांच्या गर्दीत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना वाट पाहायला लागल्याने त्यांची दिलगिरी देखील व्यक्त केली. वळसे पाटील यांच्या या कृतीने सर्वजण भारावून गेले. वळसे पाटील यांनी संवेदनशीलपणा दाखवून दिला.
सहकारमंत्री झाल्यानंतर वळसे पाटील हे पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्यात आले होते. त्यांच्या भेटीसाठी अनेक नागरिक अतिगृहात थांबले होते. मात्र सर्वांच्या भेटीगाठी घेत त्यांना या आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी उशीर झाला. ही गोष्ट जेव्हा वळसे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर ते स्वतः खुर्ची मधून उठून त्या नागरिकांच्या गर्दीत जाऊन उभे राहिले. यावेळी निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन देखील त्यांनी या नागरिकांना दिले. काहींच्या समस्या जागेवरच सोडविल्या.
वळसे पाटील यांच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली. एवढा मोठा नेता असून देखील सर्व सामान्य नागरिकांबद्दल एवढी आपुलकी असल्याचे पाहून सर्वजण भारावून गेले होते. वळसे पाटील हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. सर्व सामान्य नागरिकांबदल असणारी आपलकी प्रेम पुन्हा एकदा नागरिकांना पहायाला मिळाले.
