• Sat. Sep 21st, 2024

राधानगरी १०० टक्के भरले; कोल्हापुरात ८० बंधारे पाण्याखाली, पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने

राधानगरी १०० टक्के भरले; कोल्हापुरात ८० बंधारे पाण्याखाली, पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास गेट क्रमांक सहा, तर नऊ वाजताच्या सुमारास गेट क्रमांक पाच उघडला. आतापर्यंत धरणाचे चार दरवाजे उघडले असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. नदीची वाटचाल धोका पातळीकडे होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनही अलर्ट झाले असून खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळी धरणाचे दरवाजे उघडले

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या १०० टक्के भरले असल्याने धरणाला असलेले स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी दरवाजा क्रमांक ६ उघडला असून यामधून १४२८ क्युसेक्स विसर्ग सुरू होता तर ९ वाजताच्या सुमारास आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या दरवाजातून आणि पॉवर हाऊसमधून 1400 असे एकूण ७११२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या नदीपात्रात सुरू आहे.

धरण १००% भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात. सध्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज सकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली असून नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाऊस धुमाकूळ घालणार: राज्यातील ४ जिल्ह्यांना आज रेड तर ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार बरसणार

पंचगंगा नदी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या वरून वाहत असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४० फूट ४ इंचावर गेली असून, पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आता आपली वाटचाल धोका पातळीकडे सुरू केल्याने यंत्रणाही सतर्क झाले आहे.
अजिंठा लेणीतील सातकुंडात सेल्फीचा नाद, तरुण ७० फूट खाली कोसळला, कसाबसा जीव वाचला, Video समोर
दरम्यान राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावांतील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed