• Sun. Mar 8th, 2026

    धक्कादायक! जातीयवादाचा गंभीर आरोप, गावातील १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार

    धक्कादायक! जातीयवादाचा गंभीर आरोप, गावातील १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार

    सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथील दलित समाजाने गाव सोडून जाण्याचा निर्धार केला आहे. उद्या मंगळवारी गावातून सर्व संसार घेऊन दलित समाज पायी मंत्रालयाकडे रवाना होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पडल्यानंतर गावात जातीयवाद होत असल्याचा आरोप करत अन्य गावात पुनर्वसन करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बेडग हे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातले गाव आहे.

    सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे दलित समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र १६ जून रोजी कामन बेकादेशीर असल्याचं ठरवत, ग्रामपंचायतानी बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला होता. बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. त्यानंतर कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकर प्रेमीकडून आंदोलन करण्यात आले होते.

    कौतुकास्पद! पिंपळगाव सराईत सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण, वारकरी महिलेचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार
    यानंतर बेडग गावातल्या दलित समाजासोबत जातीयवादी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. गावात होणाऱ्या त्रासातून दलित समाजाकडून थेट गाव सोडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्या गावात डॉक्टर आंबेडकरांच्या नावाला विरोध होतोय त्या गावातून बाहेर पडायचा निर्धार समस्त दलित समाजाकडून घेण्यात आला आहे. बेडग गावामध्ये सुमारे १५० हून अधिक घरे आहेत. सर्वांनी गाव सोडून जाण्याची भूमिका घेतली आहे.

    धक्कादायक! मुंब्य्रातील शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ, पालक चिंतेत
    मंगळवारी गावातील दलित समाज गाव सोडून थेट मंत्रालयाकडे आपला संसार साहित्य, गुरढोरं आणि मुलाबाळांसह रवाना होणार आहेत.आणि मंत्रालयाकडे पायी जाऊन आंदोलन करत जातीवाद नसणाऱ्या गावात पुनर्वसन करण्याची मागणी करणार आहेत. तर गाव सोडत असल्याबाबतचं पत्र देखील बेडग ग्रामस्थांच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

    यवतमाळ हादरले! माजी सरपंचाच्या भावाची धारदार शस्त्राने निघृण हत्या, विश्वकर्मानगरातील घटना
    बेडग गाव हे राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातल्या गाव आहे. पुरोगामी टेंभा मिरवणाऱ्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बाता मारणाऱ्या महाराष्ट्रात दलित समाजावर गाव सोडण्याच्या आलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत राज्यसरकार काय भूमिका घेणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed