काय आहे प्रकरण?
भाईंदर पूर्वच्या नवघर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे बुधवारी अपहरण करण्यात आले होते. या तरुणीच्या शफिक नावाच्या मित्रानेच तिचे अपहरण केले होते. यानंतर त्याने तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून, आयफोन मोबाईल व पैशांची मागणी केली होती. अन्यथा तरुणीची हत्या करण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणाची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी नवघर पोलिस ठाण्यात केली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणीचे अपहरण करणाऱ्या शफिकशी संपर्क साधला. त्यानंतर शफिकला अटक करण्यात आली, तर तरुणीला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांची सहा महिन्यांपूर्वीच मैत्री झाली होती. मात्र शफिकने त्याचा विवाह झाला असल्याची माहिती तरुणीपासून लपवली होती.
ही बाब तरुणीला समजल्यानंतर, तिने शफिकला भेटण्यास नकार दिला होता. त्यामुळे शफिकने तरुणीचे अपहरण करत विवाह करण्यासाठी आयफोन व पैशांची मागणी तिच्या कुटुंबीयांकडे केली, असे तपासात समोर आले आहे.