• Sat. Sep 21st, 2024
राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाण्यासह या ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश राहिल तर उत्तर आणि पूर्व विदर्भातील काही भाग पुढील १ ते २ तासां चांगला पाऊस होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेत आपली कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असंही हवामान खात्याकडून सूचित करण्यात आलं आहे.

Maharashtra Weather Today : राज्यात आज पावसाचा लपंडाव, मुंबई, पुणे कोरडं तर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट

कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा…

पुढील ३-४ तासांत ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, पालघर, रायगड आणि कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाट भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस होईल, अशीही माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच १३ जुलै रोजी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली.

Sangli News : मोठ्या बंदोबस्तात गायी-म्हशींच्या गोठ्यात पोलिसांचा छापा, आत शिरताच हादरले; ३ जणांना अटक
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग, नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना आज १३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात ला आहे. शनिवार, १५ जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात वरुणराजाची कृपा; १५ दिवसांतच राधानगरीत ३७ टक्के पाणीसाठा, बळीराजाही सुखावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed