• Sat. Sep 21st, 2024
दोन मुलं अन् आईच्या मृतदेहाचं २ वर्षांनी गूढ उकललं, शवविच्छेदन रिपोर्टनेच सांगितलं आरोपीचं नाव….

ठाणे : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता मीरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल २ वर्षानंतर एका मृत महिलेवर तिच्याच दोन मुलांची हत्या केल्या गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोड इथल्या घरात एक महिला आणि तिची दोन मुले मृतावस्थेत आढळून आल्याच्या सुमारे दोन वर्षांनंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातून हा गुन्हा दाखल केला आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आईवरच खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती बुधवारी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Sangli News : मोठ्या बंदोबस्तात गायी-म्हशींच्या गोठ्यात पोलिसांचा छापा, आत शिरताच हादरले; ३ जणांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, महिला, नसरीन वाघू (४७), आणि तिची दोन मुले, सदनाज (२०) आणि हर्ष (१३), ७ सप्टेंबर २०२१ रोजी नया नगर परिसरातील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आला होता. यानंतर अखेर या प्रकरणाचा छडा दोन वर्षांनी लागला आहे.

पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना नुकतेच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाले आहेत ज्यात असे दिसून आले आहे की नसरीनच्या मुलांचा गळा दाबला गेला होता आणि तिने आपले जीवन संपवण्यासाठी काही गोळ्या घेतल्या होत्या. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. गुन्ह्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.

Crime News : दोघांनी महिलेला सकाळी नेलं अन् रात्री घरी सोडलं, तिचं वागणं बदललेलं; मृत्यूनंतर सत्य कळताच गावकरी हादरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed