• Sun. Jun 14th, 2026

    …स्वार्थासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला, अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आमदाराचे वक्तव्य

    …स्वार्थासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला, अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आमदाराचे वक्तव्य

    रत्नागिरी: चिपळूण येथे आलेल्या महापूराची आठवण आणि सगळ्यांवर ओढवलेले प्रसंग सांगताना आमदार शेखर निकम यांना गहिवरून आले. पण चिपळूणकर यांचे स्पिरीट मोठं होतं. गाळ काढण्यासाठी बचाव समितीने उभारलेला लढा महत्त्वाचा ठरला. यावेळी आपल्याला शासनाकडून मदत होणार नसेल तर आपल्याला आमदारकीचीही गरज नाही. सोडून दयावी, असाही विचार माझ्या मनात आला. पण त्यावेळीही उपमुख्यमंत्री अजिदादाच मदतीला धावले. त्यांनी एका दिवसात गाळ काढणे आणि अन्य मदतीसाठी वीस कोटी रुपये मंजूर केले.

    आदरणीय पवार साहेब हे आपले दैवत आहेत पुढेही राहतील. पण ज्या ज्या वेळी अडेल जिथे जिथे मदत लागेल त्या प्रत्येकवेळी उपमुख्यमंत्री अजित दादांनी आपल्याला मदत केली आहे. अजित दादांना आपण पाठीशी राहू असे सांगितल्यानंतर आपला निर्णय झाला होता. एकदा निर्णय झाल्यानंतर पुढे काय होईल याचा विचार करायचा नसतो, अशी आपल्याला माजी खासदार स्वर्गीय निकम साहेबांची शिकवण आहे. असे सांगत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळी परिस्थितीच शेखर निकम यांनी कथन केली. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव असलेले आमदार शेखर निकम यांनी चिपळूण मतदारसंघातील कार्यकर्त्यासाठी रविवारी खास मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी सगळी परिस्थिती कथन केली.
    सुषमा अंधारेंच्या पाठबळाने कला केंद्रांमध्ये सुरू आहेत गैरप्रकार, विभक्त पती वाघमारेंचा आरोप
    कर्तृत्वाने मेहनत करून पुढे जाण्याचे ठरवले तर त्याच्याही पाठीशी आपण सगळेच राहू असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना देत यावेळी आपल्या मनाचा मोठेपणा त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला. ही वेळ थोडी कठीण आहे, या कठीण वेळात मला साथ द्या. पुढे कसं काय करायचं ते माझ्यावर सोपवा, असे सांगत विकासकामांची काळजी करू नका, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हा निर्णय घेणे हे गरजेच होतं. पवार साहेबही आपले सगळ्यांचे दैवत आहेत. ते कायमच राहतील. पण अजितदादाही आपल्या सगळ्यांना महत्त्वाचे आहेत. कोणीतरी पुढाकार घ्यावा मतभेद विसरून घ्यावेत आणि आपण एकसंघ राहू हा प्रयत्न होता. मात्र कोणीही तसा पुढाकार न घेता काहीजण हा गेला तर तेवढ मला बरच होईल याच भावनेने सगळे वागत गेले. मग पुढे शेवटचा हा निर्णय घेण्याची वेळ आली. ही सगळी परिस्थिती आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे.

    चिपळूण येथील तीव्र धरण फुटलं. त्यावेळी अजितदादांनी खंबीर पवित्रा घेत एका क्षणात सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. चिपळूणमधील अनेक विकास मार्गी लावायची आहेत. चिपळूण शहरासाठी वेगळ्या पद्धतीचा केंद्र सरकारच्या बाराशे कोटी रुपयांचा मोठा प्रोजेक्ट करायचा आहे. यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाही यांनाही आम्ही गोव्यात आणि दिल्लीत जाऊन आजवर अनेकदा भेटलो आहे. त्यामुळे दाभोळ ते कालूस्ते हा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. त्याचे टेंडरही निघेल, अशीही महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. मतदार संघातील पाण्याचा प्रश्नही आपल्याला मिटवायचा आहे. यासाठी तीन छोटी धरणेही मंजूर झाली आहेत. आपल्याबरोबर अजितदादा असतील आणि आपण अजितदादांबरोबर असू तर आपल्याला कोणत्याही विकासकामांची कधीच कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

    थोरांसह चिमुकलेही आनंदी, मंत्री पदाची शपथ घेतल्यावर धर्मराव बाबा आत्राम पहिल्यांदाच निवासस्थानी

    ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं काही मला कधीच करता आलं नाही आणि म्हणूनच सांगतो चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाच्या स्वार्थासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. हा माझा स्वार्थ आहे. यामध्ये वैयक्तिक काहीच नव्हतं. अन्यथा मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून सुखी आहे. असं मी नेहमीच माझ्या सहकाऱ्यांना सांगत आलो आहे. अशी स्पष्ट भूमिका आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. उपस्थित कार्यकर्त्यांनीही आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेला जोरदार घोषणा देत पाठिंबा दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed