• Sat. Sep 21st, 2024

जोरदार पावसाने अचानक पूर आला; बैलगाडीसह तीन शेतकरी गेले पुरात वाहून, एकाचा मृत्यू

जोरदार पावसाने अचानक पूर आला; बैलगाडीसह तीन शेतकरी गेले पुरात वाहून, एकाचा मृत्यू

वाशिम : गेल्या महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज (मंगळवारी) जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने आलेल्या पुरात कारंजा तालुक्यातील येवता बंदी येथील तीन शेतकरी बैलगाडीसह वाहून गेले. यापैकी एकाच मृत्यू झाला तर दोघांना वाचविण्यात यश आले आहे. हे तीन शेतकरी शेतातून घरी परत येत असताना पांधन रस्त्याला अचानक पूर आला त्यात बैलगाडी वाहात जाऊन पलटी झाली. यात विष्णु महादेव हागोने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर कार्तिक हागोने (वय १८ वर्ष) आणि गणेश कापसे (वय १४ वर्ष) या दोघांना वाचविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यातील काही भागात आज दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता रखडलेल्या पेरण्यांना वेग येऊ शकतो. रिसोड तालुक्यातील लोणी परिसरात आज जोरदार पाऊस झाला. तसेच मालेगाव व वाशिम तालुक्यातील काही गावात हलका पाऊस नोंदवला गेला. तर कारंजा, मानोरा, मंगरुळपिर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

पुतण्याचे वार, नातू झाला ढाल; राष्ट्रवादीच्या पडझडीतून रोहित पवार घेणार फिनिक्स भरारी?
सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तासभर झालेल्या पावसानंतर नदी नाल्यांना पूर आला होता. कारंजा तालुक्यातील पोहा गावातील उमा नदीला पूर आल्याने दोन ते तीन तास कारंजा-पोहा रस्ता बंद झाला होता. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या होत्या, त्यांना आता वेग येईल तर पेरणी झालेली पीकही धोक्यात आली होती. त्यांनाही पावसामुळे संजीवनी मिळाली आहे.

आणखी एका भूकंपासाठी तयार रहा; ‘अजित पवार’ फक्त महाराष्ट्रात नाही, शेजारच्या राज्यात होणार मोठे बंड
वाशिम जिल्हा हा राज्यातील सोयाबीनचे हब आहे मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सोयाबीनची केवळ ६ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी २५ जून पर्यंतच सर्व पेरण्या आटोपल्या होत्या मात्र यावर्षी पेरणीला प्रचंड उशीर झाला आहे. आज आलेल्या पावसानंतर पेरणी सुरू होईल मात्र उशिरा पेरणी झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेली अतिवृष्टी लक्षात घेता यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी सरी वरंबा पध्दतीने सोयाबीनची लागवड करण्यासाठी साऱ्या पाडून ठेवल्या आहेत. या पद्धतीने लागवड केल्यास जास्त उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे.

मावळमध्ये पाण्याच्या प्रवाहाने साकव पूल वाहून गेला; वाडीवळेचं दळणवळण बंद, तर अनेकजण अडकून पडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed