• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्याकडे दिली, फडणवीस असं का म्हणाले? एका घोषणेनं वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन

मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्याकडे दिली, फडणवीस असं का म्हणाले? एका घोषणेनं वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीची चावी माझ्या हातात दिली आहे. त्यांनी दुष्काळी भागासाठी जेवढी तिजोरी रिकामी करायची ते करा, असे सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दहिवडी येथे भाजपाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार अमरसिंह साबळे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राहुल कुल यांच्यासह खटाव, माण आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

माढा व साताऱ्याची लोकसभा आपण जिंकणार आहोत. सातारा जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहे. सातारा मोदी व शिवसेना-भाजपसोबत उभा राहत आहे. मला अभिमान आहे की, जयाभाऊंसारखा नेता माझ्यासोबत आहे. तो जनतेसाठी त्याग करायला तयार आहे. जयकुमार जनता व ईश्वर तुमच्या पाठिशी आहे. जे तुम्ही ठरवले ते झाले आहे. जे तुम्ही ठरवले आहे त्यासाठी या व्यासपीठावरील सर्व नेते तुमच्या पाठिशी खंबीरपणे आहेत. तुमचा संकल्प आपण पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

जयकुमार गोरे यांच्या दुष्काळाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा झाला होता. अडीच वर्षांत त्यांनी दुष्काळी भागातील एकाही सिंचन प्रकल्पाला मान्यता आणि निधी दिला नाही. जिहे कठापूरमुळे १५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आतापर्यंत ही जमीन पाण्याखाली येऊ आहे. नये, अशी विरोधकांनी व्यवस्था केली. अडीच वर्षे नाकर्त्या लोकांचे सरकार आले. त्यांना जनतेशी, दुष्काळाशी देणेघेणे नाही, ते कसे जगतात याच्याशी देणेघेणे नाही. त्यांच्याकरिता तुम्ही फक्त व्होट बँक आहात. म्हणूनच गोरे यांनी जी योजना मंजूर केली ती योजना त्यांनी अडवून ठेवली. मात्र, भाजप-शिवसेनेचे सरकार दिला, अशी टीका फडणवीस यांनी केली.
बारामतीचा व्यापारी करणार गोपालन, थेट आंध्रावरुन पुंगनूर गाई आणल्या, पंचक्रोशीत जोरदार चर्चा, कारण….
हे पाणी डिसेंबरमध्ये येणार आहे; पण ऑक्टोबरमध्ये येणारी निवडणूक जयाभाऊ तुम्ही लढा. डिसेंबर २०२४ मध्ये १५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. यासाठी ३७० कोटींचा निधी दिला आहे. योजनेसाठी पैशाची कमतरता भासू देणार नाही, असा शब्दही देवेंद्र फडणवीस यांनी
टायटॅनिक ते टायटन… अटलांटिक महासागरात त्या पाणबुडीसोबत नक्की काय घडलं, वाचा स्टार्ट टू एंड कहाणी

माढ्यासह सातारा लोकसभेला भाजपचाच खासदार

प्रत्येक गावात पाणी आणि माण तालुक्याची हक्काची एमआयडीसी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळू शकली. त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. साताऱ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जनताच उद्ध्वस्त करु लागली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माढ्यासह सातारा जिल्ह्यातूनही भाजपचेच खासदार निवडून आणणार आहोत. विधानसभा निवडणुकीत आत्ता असणाऱ्यांसह आणखी किमान दोन आमदार आपलेच निवडून आणून देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करणार असल्याचा विश्वास जयकुमार गोरे व्यक्त केला.
ED Raid : बड्या उद्योजकांच्या बंगल्यावर अचानक धडकले ईडीचे पथक; धाडसत्राने सांगलीत खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed