• Sat. Sep 21st, 2024

मित्राच्या लग्नाला जाताना तरुणांवर काळाचा घाला; अपघातात तीन जीवलगांचा जागीच मृत्यू

मित्राच्या लग्नाला जाताना तरुणांवर काळाचा घाला; अपघातात तीन जीवलगांचा जागीच मृत्यू

बीड: धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटल्याने बीड जवळील पेडगाव परिसरात भीषण अपघात झाला झाल्याची घटना घडली . या भीषण अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान डिझायर नामक चारचाकी भरधाव वेगात जात होती. या वेळी बीड जवळील पेडगाव परिसरात आल्यानंतर चालकाचा या चारचाकीवरील ताबा सुटला. गाडी तब्ब्ल तीन ते चार पलटी मारून रस्त्याच्या बाजूला जाऊन धडकली. या गाडीत चार व्यक्ती प्रवास करत होते यातील तीन व्यक्ती ह्या अपघातात जागीच ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी दुर्घटना; ऑईल टँकरला भीषण आग; ३ जणांचा होरपळून मृत्यू

या अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे धीरज गुंदेजा (वय ३०) रोहन वाल्हेकर (वय ३२) तर विवेक कांगूने (वय ३३) अशी आहेत . तर अपघातातील जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारही जण बीडला मित्राच्या लग्नाला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती होताच पेट्रोलिंग गस्तीवर असलेल्या पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत यातील जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, तत्पूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.

एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात एक जागीच ठार, बससह ट्रकचाही चक्काचूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed