• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळ घडली मोठी घटना, दुरुस्तीवेळी अचानक पूल कोसळला, तिघे गंभीर जखमी

मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळ घडली मोठी घटना, दुरुस्तीवेळी अचानक पूल कोसळला, तिघे गंभीर जखमी

Koyna Satara Bridge Collapsed Near CM Eknath Shinde village : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात कोयना विभागातील दरेगाव. मुख्यमंत्री शिंदे यांनी कालच आपल्या दरेगावला अचानक भेट दिली होती. आणि कालच कोयना विभागात एका पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना तो कोसळला. यात तीन गावकरी गंभीर जखमी झाले.

 

satara news
साताऱ्यात कोयना विभागातील शिंदी ग्रामस्थ स्वतः पूल दुरुस्त करताना अपघात
सातारा : मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कोयनेच्या भूमिपुत्रांची अद्यापही परवड सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदी ते आरवला जोडणारा पूल ग्रामस्थ स्वतः दुरुस्त करत होते. यावेळी पूल कोसळून झालेल्या अपघातात तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाल्याने या विभागात खळबळ उडाली आहे.कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. या जलाशयाशेजारील सातारा जिल्ह्यातील शिंदी, वलवण, आरव, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाढवली आदी गावांचा आपत्तीच्या वेळी नेहमीच संपर्क तुटतो. मात्र याकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. या गावांना बाजारहाट करण्यासाठी खेडला जावे लागते. त्याला जोडणारा रघुवीर घाटही असुरक्षित आहे. कोयना या दुर्गम विभागातील शिंदी ते मोरणी हा १४ किलोमीटरचा रस्ता गेली ३५ वर्षांपासून वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. या समस्यांसाठी शिंदी येथील नवतरुण मित्र मंडळ नेहमी सक्रिय आहे. परंतु त्यांना यश येताना दिसत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावात पोहोचले; अधिकाऱ्यांची तारांबळ, राजकीय तर्कवितर्क
शिंदी ते मोरणीला जोडणाऱ्या नदीवरील लोखंडी पूल गेल्या दहा वर्षांपूर्वी पडला. या पुलाची दुरुस्ती न झाल्याने ही गावे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. प्रशासनाने या गावातील लोकांसाठी बोट दिली होती. परंतु गेली कित्येक वर्ष नागरिक या पुलासाठी आक्रोश करत आहे. पण यांचा आवाज अजूनही मुख्यमंत्र्यांच्या कानी पडलेला नाही.
उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल, बाजार समितीच्या सभापतींची तक्रार
काल ग्रामस्थांनी चक्क स्वतः स्वखर्चाने हा पूल बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वजण एकवटले आणि कामाला सुरुवात झाली. पण अचानक हा पूल पडला आणि ग्रामस्थ या पुलाखाली सापडले. या अपघातात रामचंद्र नाना शिंदे, आणाजी बर्गे आणि विनोद जयसिंग मोरे हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना लागलीच उपचारासाठी खेड येथे नेले. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला कळवा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उदयनराजे अन् शिवेंद्रराजे भोसलेंमधील वादानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस कराडमध्ये दाखल

आम्ही आमच्या जमिनी कोयनेसाठी दिल्या. आम्हाला मात्र आता अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. शासन मात्र आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आमच्या सुविधा आम्हालाच कराव्या लागत आहेत. मग अशा अपघातांना जबाबदार कोण? या अपघातातील जखमींना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ भूषण मोरे यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed