• Mon. Mar 16th, 2026
    पांडवकालीन मंदिर अखेर पाण्याबाहेर, १० महिन्यांनी दर्शन, भाविकांची गर्दी

    पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटल्याने पाण्यातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आले आहे. सध्या भाटघर धरणात अवघा ६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धरणातील पाणलोट क्षेत्रातील नदी पात्रात असलेले काबंरे गावातील पांडवकालीन कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आले आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वती मातेच मूर्ती आणि नंदी आहेत. पाण्याखाली गेलेलं हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिक आणि इतिहास अभ्यासक याठिकाणी भेट देत आहेत.
    राक्षसांनी बांधलेलं मंदिर अन् भुतांची जत्रा; नगरच्या गावातील अनोखी प्रथा माहितेय का?

    भोर तालुक्यातील ब्रिटिश कालीन धरण म्हणून भाटघर धरणाची ओळख आहे. या धरणातून सातत्याने विसर्ग कमी होत असल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदिर पाणी कमी झाल्याने बाहेर आले आहे. त्यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत. कांबरे हे गाव भोर शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. धरणाला पाणी असल्यावर जवळपास १० महिन्यांहून अधिक काळ हे मंदिर धरणाच्या पात्रात आहे.

    पुण्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटली अन् नदी पात्रात दडलेलं पांडवकालीन मंदिर बाहेर आलं

    हे मंदीर १० महिने पाण्यात असते. धरणातील पाणी कमी झाल्याने मंदीर पाण्याबाहेर आले आहे. मुख्यत: हे मंदिर भोर तालुक्यात असणाऱ्या वेळवंड नदीमध्ये वसलेले आहे. तसेच मंदिराचे मुळ नाव कर्मगरेश्वर आहे. परंतु हे मंदीर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने या मंदिराची ओळख होऊ लागली आहे. पाण्यातील लाटांमुळे या मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र यंदाच्या वर्षी हे मंदिर बाहेर आल्याने पर्यटक या मंदिराकडे आकर्षित होत आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वतीची मूर्ती आणि नंदी उभा आहे. पर्यटकांकडून या मंदिराला विशेष पसंती मिळत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed